Breaking News

मुंबई

नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार सुहास कांदे यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा …

Read More »

डिजीटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासन धोरण स्वीकारण्याचा विचार करेल मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

केंद्र सरकारने डिजीटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई उत्तर …

Read More »

मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …

Read More »

मंत्री अनिल पाटील, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करा अधिकाऱ्यांच्या बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांचे आदेश

दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात घेतली. दरडप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संरक्षक भिंत बांधण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव १० दिवसांत सादर करावेत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे …

Read More »

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलांवामध्ये किती आहे पाणी साठा पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार की तसाच पुढे सुरु राहणार

मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वापरा योग्य कमी पाण्याचा साठा राहिला. यापार्श्वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरापालिकेने घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आणि धरणक्षेत्रात थोडा थोडा करीत आता ५०.१८ टक्के पाणी …

Read More »

स्व.विलासराव देशमुख यांचा किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले, १० वीला ४२ टक्के मार्क मिळवणारा… महाराष्ट्राबद्दल प्रेम असलंच पाहिजे

नुकत्याच झालेल्या युपीएससी परिक्षेत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेकांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. याउत्तीर्ण झालेल्या गुणवतांचा सत्कार करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचा एक किस्सा आज दहावीत ४२ टक्के गुण पडलेत तो आज आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय असे सांगत आज तुम्हाला लोकशाही …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश

मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील ( स्वायत्त महाविद्यालये वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषांने एकेडॅमिक बँक ऑफ …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांची माहिती

इर्शाळवाडी ता. खालापूर जि. रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी केले. विधान परिषद उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे यांनी आज …

Read More »

अजित पर्व आणि मणिपूर हिंचाचारावर संजय राऊत म्हणाले, कोणीही ट्विट करण्याची गरज नाही…. एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज वाढदिवस आहेत. या वाढदिवसानिमित्त नागपूरमधील भाजपा कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. हे बॅनर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कारण यावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीचा २०१९ सालचा फोटो असून त्यावर लिहिलेली वाक्ये लोकांचं लक्ष वेधून …

Read More »

मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील अडचणीसंदर्भात दोन आठवड्यात बैठक झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार

झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबाबत मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत उच्चस्तरिय बैठक दोन आठवड्यात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. विधानसभेत …

Read More »