मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देवून दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र देत स्टारलाईटच्या तुतीकोरीन प्रकल्पासाठी ज्या पध्दतीने संघर्ष झाला पध्दतीने पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने तो …
Read More »शेतकरी आंदोलनाच्या आडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशांतता निर्माण परवतेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पलटवार
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवी यासाठी शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार भाजप उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने आयोगाने स्वतः लक्ष घालण्याची मागणी
दिल्ली : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला. एकंदरीत निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करते आहे असे चित्र दिसून आले. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण …
Read More »पत्ता कट होवूनही मुख्यमंत्र्यांची सूचना आणि आरोग्य मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी डॉ.दिपक सावंत यांचे भवितव्य ठरणार जुलै महिन्यात
मुंबई : प्रतिनिधी जुलै महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेने आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना उमेदवारी न देता प्रभाग क्र.४ चे पदाधिकारी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. यापार्श्वभूमीवर आज मंगळवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला …
Read More »शिवसेनेशिवाय विजय शक्य नसल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांची कबुली
मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेनेने चांगलीच कुरघोडी केली. तसेच आहे त्या जागा राखण्यातही यश आले नसल्याने आगामी निवडणूकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला यश मिळणे शक्य नसल्याची चिंता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश …
Read More »विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै पासून नागपूरला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून तीन महिन्यानंतर आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे. विधान सभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.०० …
Read More »मंत्र्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही तोच कार्यालय रिकामे करून देण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाचा प्रताप
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधन होवून त्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही. तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने कालच अर्थात गुरूवारी दुपारनंतर त्यांचे कार्यालय तातडीने रिक्त करून विभागाकडे सुपुर्त करावे असे आदेश कृषी मंत्र्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बजाविल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस …
Read More »शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपा सदैव तयार मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच तयार आहे. पण शिवसेनेलाच युती करायची नसेल तर पालघरमध्ये लढलो, भविष्यात इतरत्र लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच भंडारा-गोंदियामधील दुष्काळामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावाही …
Read More »ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३५ वाजता सोमय्या रूग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर त्यांच्या खांमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. …
Read More »पीक विम्याची रक्कम ७ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा मुख्यमंत्र्यांचे विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ७ जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. प्रधानमंत्री पिक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण …
Read More »