Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

नाना पटोले यांचा आरोप,… महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचे जंगलराज कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू

गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणा-या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून …

Read More »

शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवार यांची मागणी,…मास्टरमाईंड शोधा डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक...

पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी करत अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते …

Read More »

शरद पवार धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे यांचा इशारा,…. तर देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार शरद पवारांना सोशल मिडियावर धमकी ; खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचे धर्मांतरावरून पोलिसांना आव्हानः ४०० सोडा ४ तरी दाखवा उगीच मुंब्र्याला बदनाम करू नका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव घेताच थुंकले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचं नाव घेतल्यावरही थुंकले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भ… वरुन …

Read More »

धनंजय मुंडे यांची आता क्रिकेटच्या मैदानात एन्ट्रीः हा संघ घेतला विकत एमसीएकडून आयोजित स्पर्धेत खेळणार मुंडेंचा संघ

भाजपाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याच्या राजकारणात चांगल्याप्रकारे यशस्वी यशस्वी ठरल्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री मारली आहे. पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धेचं १६ ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केलं आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीगमध्ये खेळणार …

Read More »

.. तर निलेश राणेसह भाजपाने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी निलेश राणेला २४ तासाचा अल्टीमेटम...

निलेश राणेने केलेल्या ट्विटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्विट मान्य आहे का? या ट्विटशी भाजपा सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपाने …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, …तर याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, याची काळजी …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, हे जाणून बुजून घडविल्या जातय कोल्हापूरातील घटनेवरून भाजपा आणि राज्य सरकारवर केली टीका

राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर …

Read More »

अजित पवार यांचा निशाणा, ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणली जातेय...

मुंबईतील शासकिय वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. तसेच असल्या घटना राज्यात …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक… रोहयो आणि संजय गांधी निराधार योजनेवर केलेल्या जाहिरातीची अजित पवारांनी केली पोलखोल

सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे, त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि …

Read More »