देशात सध्या लोकसभा निवडणूकांचे वारे वहात आहे. त्यातच काँग्रेसची बँक खाती गोठविल्याच्या मुद्यावरून आधीच भाजपा आणि नरेंद्र मोदी-भाजपाला यांना लक्ष्य करण्यास देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच काल रात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावरून विरोधी पक्षांनी तयार केलेल्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी भाजपावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही एक्स या सोशल नेटवर्किंग ब्लॉगवरून भाजापावर टीकास्त्र सोडले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक असल्याची खोचक टीका केली.
केजरीवाल यांची अटक ही दडपशाही !
कोर्टाने पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की कॅबिनेट डिसीजनमध्ये झालेल्या निर्णयावर तुम्ही प्रश्न विचारु शकता का? चौकशी करु शकता का? हे बेसिक आहे. संविधानामध्ये कॅबिनेट नोट किंवा कॅबिनेट डिसिजन हे असताना तुम्हाला कोर्टामध्ये काॅल करता येत नाही. जेव्हा…
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 22, 2024
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ED, सीबीआय, आयटी विभाग आणि ईव्हीएम या स्वायत्त संस्थांचा वापर करून भाजपा देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई करत असल्याचे बोलले जात आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. ही कारवाई दडपशाहीतून होत असल्याचा आरोपही यावेळी भाजपावर केला.
BJP’s List of Star Campaigners —
1. ED,
2. CBI,
3. IT department
4. EVM— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 22, 2024