Breaking News

राजकारण

१० वीच्या पुस्तकातील तो नकाशा नाहीच तर ती केवळ प्रतिमा पाठ्यपुस्तक मंडळाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि संशोधन मंडळाने १० वीच्या तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात जम्मू काश्मीरचा जो नकाशा दाखविण्यात आला त्यामधील बराचसा भाग देशाच्या सीमेबाहेर दाखविण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यास तात्काळ पाठ्यपुस्तक मंडळाने त्यावर तात्काळ खुलासा करत तो नकाशा नसून अद्यावयत तंत्रज्ञानाने तयार केलेली …

Read More »

विधान परिषदेच्या तीन जागा निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीची काँग्रेस सोबत आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी येत्या मे  महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. उपलब्ध संख्याबळानुसार कॉंग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेसच्या वाट्याची एक जागा आणखी मागून तीन ठिकाणी उमेदवार देण्याची रणनीती राष्ट्रवादीची …

Read More »

आगामी निवडणुकांच्या खर्चासाठी भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून मुंबईकरांचे जीवन भविष्यात अधिक दुष्कर होईल अशी भीती व्यक्त करत कर्नाटक व २०१९ च्या निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने मुंबई विकायला काढल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधीत करताना …

Read More »

देशप्रेमी सरकारच्या शिक्षण विभागाने जम्मू-काश्मीरचा मोठा भाग दिला पाकिस्तानला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची दोषींना अटक करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशप्रेमाचे आणि पारदर्शक कारभाराच्या वचनांचे गो़डवे गात सत्तेवर आलेल्या भाजप सरकराच्या शिक्षण विभागाने नुकत्याच काढलेल्या दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकातील भारताच्या नकाशातून जम्मू व काश्मीरचा मोठा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला असून, या गंभीर प्रकणी सरकारने संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल …

Read More »

एसटी महामंडळात नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई  : प्रतिनिधी एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. ही कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल असेही त्यांनी सांगितले. मंत्री रावते म्हणाले, एसटी महामंडळात भरती होणाऱ्या …

Read More »

अनेक जिल्हे दुष्काळात असताना फक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा ? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्हे भीषण दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र सरकार केवळ ८ तालुक्यातच दुष्काळ कसा जाहीर करते, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार अत्यंत असंवेदनशील व शेतकऱ्यांप्रती अनास्था दाखविणारा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, इतर दुष्काळी तालुक्यांमध्येही …

Read More »

क्रांतीसुर्य आणि क्रांतीज्योतीचे स्मारक पुणे विद्यापीठात उभारणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या. या स्मारकाच्या उभारणीसाठी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करण्याची ग्वाही …

Read More »

एकनाथ खडसेंना अडकविण्याची सुपारी भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यांची सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : प्रतिनिधी जमिन घोटाळा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबध असल्याच्या आरोपावरून मंत्री पदावरून पाय उतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अडकवण्यासाठी भाजपाच्याच एक ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला. एकनाथ खडसे यांना खोट्या केसेसमध्ये अडकाविण्यासाठी झालेल्या …

Read More »

राज्य सरकारमुळे नाणारचा तमाशा झालाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरीच्या प्रकल्पावरून सध्या सुरु असलेला गोंधळ हा आतून किर्तन बाहेरून तमाशा झाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्याचे उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाईं हे जाहीर सभेत सांगतात कि अधिसूचना …

Read More »

नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्री खरे की शिवसेनेचे उद्योगमंत्री ? रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे उद्योग मंत्र्यांचे वक्तव्य तर मुख्यमंत्री म्हणतात निर्णय घेवू

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी भू-संपादनाची प्रक्रिया थांबविण्यासाठी याबाबतची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करत त्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिल्याचे सांगत याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे जाहीर …

Read More »