Breaking News

राजकारण

शरद पवार म्हणाले, आगामी निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची

देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर इथे आयोजित महाविकास आघाडीच्या वतीने …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिला राजीनामा

देशातील लोकसभेचा कार्यकाळ ३० जून २०२४ रोजी पूर्ण होत आहे. मात्र तत्पूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची आचासंहिताही जाहिर केली जाणार आहे. तत्पूर्वीच लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल …

Read More »

काँग्रेस-डिमकेच्या आघाडीत कमल हसनही सहभागीः जागा वाटपावर शिक्कामोर्तब

इंडिया आघाडीतील तामिळनाडू राज्यातील डिमके अर्थात द्रविड मुनेत्र कझघम पक्षाबरोबर असलेली काँग्रेसबरोबरील आघाडीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या आघाडीत दाक्षिणात्य स्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मैय्यम हा पक्षही सहभागी झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू मध्ये डिएमके पक्षाबरोबर काँग्रेस आणि मक्कल निधी मैय्यम हा पक्ष आघाडी म्हणून लोकसभा निवडणूकीला …

Read More »

तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब

दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाला अद्याप एके ठिकाणीही शिरकाव करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतची आघाडी तोडलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साद घातली. परंतु नाय-होय, होय-नाय म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला प्रतिसाद दिला. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते पवन …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गाळमुक्त धरण प्रकल्पांचे उद्घाटन

मौजे दरे येथील ‘बांबू मूल्यवर्धन केंद्र’ आणि ‘टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे’ लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. दरे तालुका महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार …

Read More »

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार

कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन …

Read More »

अरूणाचलमधील तवांगला जोडणाऱ्या सर्वाधिक लांब बोगद्याचे उद्घाटन

ईशान्य भारतातील ७ राज्यांतील विविध विकास अशा ₹५५,६०० कोटी रूपये किमतीच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुमारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अरूणाचल प्रदेश मधील तवांग प्रदेशाला जोडणाऱ्या सामरिक सेला बोगद्याचा समावेश आहे. इटानगर येथून मणिपूर, मेगालय नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरूणाचल प्रदेशातील विविध विकासांचा शुमारंभ केला. सुमारे ₹८२५ कोटी खर्चून …

Read More »

हाच तुमचा नवीन भारत आहे का? मुस्लिमांसोबतच्या त्या व्हिडिओवर संताप

राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एैतिहासिक परिषद माणगाव येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा …

Read More »

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …

Read More »