Breaking News

राजकारण

राज्य सरकारचा मोठा निर्णयः केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्र शासनाच्या १७ मे २०२२ च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट – ड ते गट – अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, त्या दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकार काय लपवतंय ? राज्यपालांना पत्र, खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून …

Read More »

त्या सगळ्या चर्चांवर भाजपा म्हणते, …त्यानंतर या बातम्यांना पेव फुटले अजित पवार यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असे वक्तव्य करणार नाही

मागील चार-पाच दिवसाहून अधिक काळ अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला. त्यावर शिंदे गटातील आमदार नेत्यांबरोबरच मंत्र्यांनीही अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील सदरामधून काही संदर्भ देत अजित …

Read More »

संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, खरे तर भाजपाला राग यायला पाहिजे, इतरांना नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, पक्ष सोडण्यासाठी किती जणांवर दबाव

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात जाणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असा इशारा संजय राऊत यांचं नाव न घेता दिला. यानंतर आता संजय राऊत यांनी …

Read More »

अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …

Read More »

काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,…ती दोन माकडं पोसलीत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे काम सुरुय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारलं असता त्यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी १८ एप्रिल रोजी अकोला येथे पत्रकारांनी …

Read More »

राज्यातील शाळा १५ जून पासून पण विदर्भातील ‘या’ तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात …

Read More »

अखेर त्या चर्चांवर अजित पवार स्वतःच म्हणाले, ‘अरे बाबांनो… ‘ध’ चा ‘मा’ करु नका ना… बोलणार्‍यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, 'अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर'...

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा राजकिय भुकंप होऊन नवी सत्ता समिकरणे पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले. अखेर या चर्चेवर राष्ट्रववादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच खुलासा करत म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून …

Read More »