Breaking News

दिपक केसरकर म्हणाले, आमचं बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर प्रेम… केवळ त्यांच्यामुळेच हे सगळं झालंय

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या फुटीवर शिक्कामोर्तब करत या दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण वापरण्यास मनाई करणारा आदेश काल शनिवारी रात्री दिला. तसेच अंधेरी पोट निवडणूकीसाठी पर्यायी पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविण्याची सूचना दोन्ही गटाला केली. या आज रविवारी सकाळपासून शिंदे गट आणि ठाकरे …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाल्या,…ते सांगतात पण तशी आयोगात नोंदच नाही

शिवसेनेसह निवडणूक चिन्हावर दावा करणारी याचिका एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. त्या याचिकेला उध्दव ठाकरे गटाकडून काल सविस्तर कागदपत्रे सादर करत प्रत्युत्तर दिले. त्यावर निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याचे अधोरेखित करत मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या अपेक्षेनुसार निवडणूक आयोगाने “धनुष्य बाण” चिन्ह गोठवलं शिवसेनेकडून अंधेरी पोटनिवडणूकीत नव्या चिन्हाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेना आणि चिन्हावर दावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही शिवसेना आणि धनुष्य बाण आपल्याच गटाचे असल्याचा दावा केला. परंतु निवडणूक आयोगाकडून नियमानुसार दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर आज दुपारी सुट्टी असतानाही आयोगाच्या वरिष्ठांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे चिन्ह …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता पक्ष प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि दलितांना समान हक्क व समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत, दलितांवरील अत्याचार थांबणार नाही, त्यामुळे हे कृतीमध्ये आणण्यासाठी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. मोहन भागवत यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव

वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेव्दारे आळंदी येथे आयोजित संत दासोपंतस्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि …

Read More »

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, त्या घटकांना जाणीव व्हायला लागली..

विदर्भ संशोधन मंडळाच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राम्हण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्था घट्ट झाली आणि आपल्याकडून मान खाली घालावी घालवायला लावणारे क्रत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आपली लढाई लोकशाही मुल्यांची जपणूक करण्यासाठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील …

Read More »

नाना पटोलेंचे आव्हान, सावरकरांना पेन्शन कशासाठी मिळत होती, फडणवीसांनी सांगावे फडणवीसांना त्या वक्तव्याने मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाकटमध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांच्याविषयी जे विधान केले त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे? सावरकर व आरएसएसचे स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नाही. …

Read More »

राहुल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना सवाल सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचे समर्थन करणार का?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसला लक्ष्य केले. त्याचबरोबर ‘संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड अर्थात भत्ता घ्यायचे,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी केलेल्या …

Read More »

गोविंदा प्रथमेश सावंतचे निधन…. दिड महिन्यापासून उपचार सुरू होते

घाटकोपर परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून गंभीर जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचे शनिवारी केईएम रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो २० वर्षांचा होता. साधारण दीड महिन्यांहून अधिक काळ त्याची रुग्णालयात मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. प्रथमेशच्या मृत्युमुळे करीरोड परिसरात शोककळा पसरली. प्रथमेशच्या लहानपणीच …

Read More »