मुंबईः प्रतिनिधी
भाजप सरकार डिझास्टर मॅनेजमेंट नाही तर डिझास्टर टुरिझम करत आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते सैरसफाटा मारायला आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे भाजप सरकार असंवेदनशील आहे. वेळेवर निर्णय घेत नाही. लोकं आज अडचणीत आहेत आणि हे प्रचार कसा होईल याकडे यांचे लक्ष आहे.
सरकारचा हा भोंगळ कारभार राज्यातील जनता पहात असून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
Tags bjp flood situation girish mahajan nawab malik ncp
Check Also
नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण
मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …