Breaking News

अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिझी
मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले.
आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १३३८ रुग्ण बरे होवून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *