Breaking News

Tag Archives: shivsena

अखेर खोके टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर, आम्ही ५० नाहीतर २०० खोके देतो भंडाऱ्यातील सभेत दिले विरोधकांना प्रत्युतर

शिवसेनेत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात ४० आमदारांना सोबत घेत स्वतंत्र चूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही स्थापन केले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर खोके सरकार अशी टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

पदयात्रेतील शिवसेनेच्या सहभागावर भाजपाची टीका अनावश्यक

कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुल गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे …

Read More »

गजानन किर्तीकरांनी ठाकरेंची मशाल सोडत हाती धरली शिंदेंची ढाल तलवार

मागील अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच या अनुषंगाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही किर्तीकर हे उध्दव ठाकरे गट सोडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार आज गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरे गटाची साथ सोडत …

Read More »

राष्ट्रवादीचा पलटवार, बावनकुळे यांनी मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा आणि नंतर बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जादूटोणा केल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले …

Read More »

भाजपा म्हणते, राष्ट्रवादीने उध्दव ठाकरेंवर जादूटोणा केला… पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात …

Read More »

संजय राऊत घरी आल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, न डगमगता लढतो तोच मित्र

शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची काल जामीनावर मुक्तता झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. त्यानंतर आज मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांचे उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी औक्षणही केले. यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मी लिहीणारा माणूस दोन पुस्तके लिहीली पण…

मागील तीन महिन्यापासून पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात राहिलेले उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना काल जामिन मिळाला. त्यानंतर रात्री ६.४५ वाजता त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथे जात भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार …

Read More »

सांगोल्याचे शेतकरी आदित्य ठाकरेंना म्हणाले, आमचे आमदार खोके घेऊन गायब सांगोल्यात भर उन्हात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकरी संवाद यात्रा काढत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरे बुधवारी सांगोल्यात भर उन्हात शेतकऱ्यांशी शेताच्या बांधावर संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक आमदार शहाजी बापू पाटील यांच्याविषयीचा संताप आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला. आमचे आमदार खोके घेऊन गायब झालेत, अशी …

Read More »

आदित्य ठाकरे ११ नोव्हेंबरला राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहोचली. या यात्रेत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सहभागी होणार होते. मात्र आता दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, …

Read More »

आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल, स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार?

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात …

Read More »