काही वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नी दौरा केला. त्यावेळी विधवा कलावती यांची भेट घेत तीला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच तात्काळ ३ लाख रूपयांची मदतही दिली. त्यावरून सध्याच्या केंद्रातील भाजपा प्रणित नरेंद्र मोदी सरकारने राहुल गांधी यांनी मदतीचे आश्वासन दिलेल्या कलावधी महिलेला भाजपाच्या मोदी सरकारने सगळ्या गर्जा …
Read More »नाना पटोले यांची खोचक टीका…शरद पवारांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप मोदींचेच काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षात नेहमीच सर्वांना संधी दिली जाते. शरद पवारांनाही काँग्रेसने आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अशा विविध पदांची जबाबदारी दिली. पण त्याच शरद पवारांच्या …
Read More »राहुल गांधी यांचा मोदींसह भाजपावर निशाणा; भारताचे तुकडे करताय, मणिपूरमधील आईला मारलत… अविश्वास ठरावावरून राहुल गांधी यांची मोदी यांना रावणची उपमा
मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे विरोधकांनी याप्रश्नावर चर्चेची मागणी करत सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव संसदेच्या लोकसभेत आणला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या …
Read More »‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा
मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, नकारात्मक विचाराच्या बाहेर…. देशभरात पाचशे आठ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४,४७० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात २७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील ४९, महाराष्ट्रातील …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात …
Read More »नाना पटोले म्हणाले,… शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक देशातील हुकूमशाही शक्तींच्या पुढे काँग्रेस झुकली नाही व झुकणारही नाही
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची मागणी, …अन्यथा पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि राष्ट्रवादीची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची बदनामी केली
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले, त्या आरोपानुसार खटले दाखल करावेत किंवा जाहिरपणे माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी …
Read More »पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »