Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

मुख्यमंत्री तुमचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे व ही लाट सुनामीसारखी असण्याची शक्यता आहे, असा अचूक अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये जाहिररित्या वर्तवला होता. पण या लाटेला तोंड देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच महिन्यात तयारी काय केली, हे सांगितले पाहिजे, …

Read More »

या ३५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले दोन महिन्यांचे अर्थसहाय्य सामाजिक न्याय विभागांतर्गत सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये …

Read More »

१३ विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य झाले. त्यामुळे या सर्व परिक्षा आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सरकारने आज आणखी कडक निर्बंध …

Read More »

कोविड दक्षता समिती स्थापन कराव्यात आणि कामगारांचे लसीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : मुंबई गेल्या वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी सूचना करत …

Read More »

७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांनो नावे नोंदवा आणि सानुग्रह अनुदान घ्या नाव नोंदविण्याचे परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात  बैठक संपन्न झाली. राज्यात सात लाख …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: १० वीची परिक्षा अखेर रद्द मंत्रिमंडळ बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर सीबीईएस, आयसीईएस केंब्रीज बोर्डांनाही याबाबत सूचना करत पुढील निर्णय घेण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार या बोर्डांनी १० वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्तीवर राज्यातील १० …

Read More »

‌BreakTheChain: हि दुकाने यावेळेनंतर बंद पण होम डिलीव्हरी सुरु राहणार राज्य सरकारकडून आज पुन्हा नव्याने आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवेतील दुकांनातील वस्तु खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरताना आढूळ येत आहेत. तसेच दुकांनावर खरेदीच्या निमित्ताने गर्दीही करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी त्याची साखळी वाढतच असल्याने राज्य सरकारने नव्याने निर्बंध लादत हॉटेल-रेस्टॉरंट वगळता अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच्या वेळेचे बंधन घातले आहे. यासंबधीचे आदेश …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला अखेर यश: १८ वर्षावरील सर्वांना लस पंतप्रधान मोदींचे मानले आभार, १ मे पासून लस मिळणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची लस १८ वर्षावरील सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वप्रथम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आणि पत्राद्वारे केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात पंतप्रधान …

Read More »

अजित पवारांचे आदेश, आर्थिक पॅकेजमधील लाभार्थ्यांना मदत निधी वाटप करा निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ …

Read More »

राज्यातील किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करूनही जनता किराणा दुकानाच्या नावाखाली रस्त्यावर बाहेर फिरत आहे. तसेच गर्दीही करत आहे. त्यामुळे आता किराणा दुकाने उघडी ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले असून राज्यातील सर्व किराणा दुकाने आता सकाळी ७ ते  सकाळी ११ वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »