Breaking News

Tag Archives: chhagan bhujbal

सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात: आर्थिक तोडग्यासाठी दोन समित्या विशेष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश येत असल्याने अखेर या आजाराशी लढा देण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही कपात एक वर्षासाठी करण्याचा …

Read More »

मोफत तांदुळ वाटप सुरू अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ ३ एप्रिलपासून टप्या-टप्याने  देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मे.टन तांदूळ भारतीय …

Read More »

कोरोनाला न घाबरता मंत्र्यांनी लावली हजेरी मंत्रिपरिषदेला मंत्रालय, जिल्ह्यातून मंत्र्याची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढतच असताना या आजाराच आगामी काळात पराभूत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे यातील अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून बैठकीला हजेरी लावली. मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

ओबीसी स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिल्लीला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपाची संयुक्त मागणी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाची लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नसल्याने त्यांना आरक्षणाचा, आर्थिक सवलतीचे फायदे देता येत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जातनिहाय स्वतंत्ररित्या जणगणना करण्यात यावी अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने संयुक्तरित्या मागणी केली. तसेच २०२१मध्ये होणाऱ्या जणगणनेत ओबीसींची जातनिहाय संख्याही गोळा करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या जणगणनेसाठी २६ कोटींची तरतूद

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या. विशेष म्हणजे या पुरवणी मागण्यात काही नव्या योजनांचा सुतोवाच करण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी करण्यासाठी करण्यात …

Read More »

ओबीसींची संख्या कळण्यासाठी जणगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवा राज्य विधिमंडळाची केंद्राला शिफारस

मुंबईः प्रतिनिधी देशासह राज्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरीकांच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व फायदे देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याधर्तीवर ओबीसी प्रवर्गातील नागरीकांनाही निधी देण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. तेव्हा त्यांच्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र ओबीसी नागरीकांची निश्चित अशी आकडेवारी नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रखाना …

Read More »

शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रू.ची रक्कम डिपॉझिट ठेवणार आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मान जगता यावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० …

Read More »

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी ६० हजार कोटी रूपये? सहकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणी केली होती. मात्र कर्जमाफीसाठी ६० हजार कोटी रूपयांचा आकडा सहकार विभागाने पुढे केल्याने महाविकास आघाडी सरकार अवाक झाले असून नेमकी वास्तविक आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कृषी व …

Read More »

भाजपा वगळून सत्ता स्थापन करण्याची काँ-राच्या मित्रपक्षांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीची बैठक संपन्न

मुंबईः प्रतिनिधी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या …

Read More »