Breaking News

Tag Archives: budget session 2023 at mumbai

छगन भुजबळांनी धरले धारेवर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही ; छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीचा सभात्याग

राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, काल पंतप्रधानच बदलले आता ते माझे गटनेता पदही धोक्यात… मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते...

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मोर्चाची भीती? कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रू.चे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

शेत मालाला योग्य दर मिळत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर टाकणे पसंद करत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे आर्थिक आरीष्ट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्याप मदत जाहिर केली नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ विधान भवनाला घेराव घालण्यासाठी नाशिक मुंबईकडे …

Read More »

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधातील आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा? अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी …

Read More »

जुन्या पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा आश्वासन, कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर… जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक विधान परिषदेत बोलताना ६ हजार ५०० इतके मानधन करणार असल्याचे केले स्पष्ट

ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, खतासाठी शेतकऱ्याला जात विचारणाऱ्यावर कारवाई करा पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर …

Read More »

अजित पवारांचे आव्हान, किमान फडणवीसांनी घोषणा केल्याप्रमाणे तरी करावं… रोज आठ शेतकरी संपवतात जीवन- शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन

राज्यातील कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आश्वासन सरकार सभागृहात देत असले तरी फिल्डवर प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. खरं तर सरकारने कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हीच मागणी करत असत, मग …

Read More »

लोढांच्या लव्ह जिहादवक्तव्यावरून अबु आझमी, गुलाबराव पाटील यांच्यात झुंपली अखेर अजित पवार यांच्या सूचनेनंतर वाद थांबला

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात ८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खास महिला सदस्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत विशेष सत्र बोलविण्यात आले होते. यावेळी राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक विधान करत राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली …

Read More »

वर्षा गायकवाडांच्या प्रश्नावर मंत्री राठोडांची घोषणा, मुंबईतील मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांचाही पुनर्विकास विधानसभेत लक्षवेधी सुचनेवरील चर्चेवेळी दिली माहिती

सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय गृहनिर्माण योजना राबविली जाते. लवकरच मंत्रीमंडळासमोर मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनर्विकास धोरण आणण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील ४५ वर्षांपूर्वी मागासवर्गीयांसाठी बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेच्या पुनर्विकास कामाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. …

Read More »