मुंबईः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले.
निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
2014 च्या निवडणुकीत जनतेसमोर मोदीजींचे नाव होते व त्यांच्याकडून अपेक्षा होती. या निवडणुकीत जनतेसमोर मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम आणि त्यांचे जागतिक पातळीवर प्रस्थापित झालेले नेतृत्व होते व त्यामुळेच भाजपाला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट झाली. बुथस्तरापर्यंत पक्षाची प्रभावी रचना झाली. त्यामुळे पक्षाला विजय मिळाला. मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम जनतेला पसंत पडले आहे. त्यासोबत भाजपाची पक्ष संघटना अधिक बळकट झाली आहे. गेली पाच वर्षे भाजपा सातत्याने सर्व निवडणुकात राज्यात पहिल्या नंबरवर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतही राज्यात भाजपाने जिंकलेल्या जागा व मिळालेली मते या बाबतीत पहिला नंबर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भाजपा- शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-राष्ट्रीय समाज पक्ष-शिवसंग्राम- रयत क्रांती संघटना यांच्या महायुतीने राज्यात एकजुटीने काम केले, त्यामुळे महायुतीला राज्यात जबरदस्त यश मिळाले आहे. आपण भाजपातर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानतो. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या निवडणुकीत महायुतीसाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या व त्याचा लाभ झाला.
निवडणुकीतील जनतेचा आशिर्वाद भाजपा नम्रपणे स्वीकारत आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नव्या जोमाने काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Tags amit shah bjp narendra modi raosaheb danave
Check Also
नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …