Breaking News

Editor

अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या घरातील बैठकीतील माहिती बाहेर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिन वाटपाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जमिन वाटपाचा आणि टीईटी परिक्षेत सत्तार यांच्या मुलींना फायदा दिल्याचाही घोटाळा उघडकीस आला. मात्र ऐन अधिवेशनात हा मुद्दा कोणी बाहेर पुरविला यावरून शिंदे गटातच आता घमासान सुरु झाल्याचे चित्र दिसून …

Read More »

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विधानसभेत माहिती

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबधीत प्रलंबीत विषय यामुळे मार्गी लागला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. धोकादायक किंवा किमान ३० …

Read More »

अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले, आज सहा महिने झाले…त्यातून बाहेर पडा तुमच्या त्या गोष्टीशी आम्हाला घेणं-देणं नाही

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्याना आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राईट टू रिप्लाय अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या एकूणच भाषणावरून चांगलेच सुनावले. त्यामुळे ज्या जोरदारपणे मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टोला, घरात बसणाऱ्याला कसं आव्हान देणार प्रबोधनकार आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली

विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांन केलेल्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तांतर झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आम्ही वर्षावर गेलो. मात्र ज्या अंधश्रध्देच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे यांनी …

Read More »

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

“नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे, खते यांचे गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी …

Read More »

नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनास मंजूरीकरीता सादर केला असून, यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचे प्रस्तावित आहे. यावर नगररचना संचालकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात …

Read More »

अजित पवारांचा आरोप, कर्नाटक आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात राज्याच्या हिश्श्याचे पाणी आणि पर्यावणाला धोका

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्या कर्नाटक सरकारने केल्यानंतर आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर अजित पवार यांनी …

Read More »

अध्यक्षांवरील विरोधकांचा अविश्वासाचा ठरावः अजित पवार म्हणाले, माहिती नाही काँग्रेससह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची चर्चा

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सातत्याने विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असा इशारा दिला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर विधानसभेने निलंबनाची कारवाई केली. मात्र शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट …

Read More »

काँग्रेस म्हणते, एमपीएससीने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा एमपीएससीच्या लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा …

Read More »