Breaking News

भाजपाच देशद्रोही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा हीच देशद्रोही आहे हे मतदान करुन सिद्ध करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला देशद्रोहींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
मोदींच्या या आवाहनावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला. जनता ही दिल्लीची मालक आहे त्यामुळे ही जनताच आता भाजपाला दणका देईल असेही नवाब मलिक म्हणाले.

 

Check Also

अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केली १० आश्वासनांची हमी

सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जून रोजी पर्यंत अंतरिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *