Breaking News

पवारांच्या माघारीने महायुतीच्या नेत्यांमध्ये हर्षोल्लास युतीचा सर्वात मोठा विजय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीतील रासपचे महादेव जानकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षोल्लास व्यक्त करत पवारांची रिंगणातून माघार म्हणजे युतीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले.
देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो, त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता आता कोणतीही लाट वगैरे दिसत नाही असंही म्हटलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोदींचा वाढता पाठिंबा पवारांना लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याचे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *