Breaking News

Tag Archives: bacchu kadu

अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर भाजपाचे शिक्कामोर्तब

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यातच खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन पुकारले. तर स्थानिकस्तरावर शिवसेना नेते आनंदराव आडसूळ …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

मंत्री पदावरून आमदारांनी घातला मुख्यमंत्री शिंदेंना वर्षावर घेरावः इकडे अधिकारी मात्र ताटकळत रायगडचा पालकमंत्री भरत शेठ, अध्यक्ष पद नकोय मंत्री पद हवय आमदारांनी धरला हट्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच काकाच्या अर्थात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये एकच खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री शिंदे हे महत्वाच्या बैठकांसाठी मंत्रालयात निघाले. मात्र त्यांच्याच गटातील आमदारांनी मंत्री पदाच्या …

Read More »

राज्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान राबविणार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची घोषणा

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. नव्याने निर्माण करण्यात आलेला दिव्यांग कल्याण विभाग तीन महिन्यात दिव्यांगांच्या दारी पोहचला असून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती या …

Read More »

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री …

Read More »

‘नियम सारखेच…’ बॅनरबाजीवर बच्चू कडूंचे प्रत्युत्तर, या अज्ञानामुळेच सत्ता जाते… पाषणा येथील बॅनरबॅजीवरून राष्ट्रवादीवर केली टीका

२०१९ साली कर्नाटकातील कोलर येथील जाहिर सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीका करताना नरेंद्र मोदींबाबत अपमानकारक वक्तव्या केले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी (विधानसभा सदस्यत्व) रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर काल २५ मार्च रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने …

Read More »

विषय कामगारांच्या लग्न तुटण्याचा पण देवेंद्र फडणवीसांनी जोडला आदित्य ठाकरेंच्या लग्नाशी आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना हजरजबाबी उत्तर

राज्याचे अधिवेशन सुरु होऊन शेवटच्या आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी बाकावरून एकमेकांना चिमटे आणि टोप्या उडविण्याचे प्रकार तसे कमीच पाह्यला मिळाले. परंतु दर अधिवेशनात विरोधी बाकावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी बाकावरील भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांच्या टोप्या उडविण्यात येतात. परंतु आज चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …

Read More »

अंधारेंच्या टीकेला बच्चु कडूंचे प्रत्युत्तर, आमची स्वतःची पानटपरी..कुठे लावायची ते आम्ही ठरवू आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि पाठिंबा देणारे १० अपक्ष आमदारही बंडात सहभागी झाले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुतच आहे. त्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा पक्ष बांधणीच्या उद्देशाने शिवगर्जना यात्रा सुरु केली असून ही शिवगर्जना यात्रा घेऊन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावतीत …

Read More »

बच्चू कडू यांचा घरचा आहेर, उगीच फुल काढायचं आणि खिशात ठेवायचं करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला खोचक सल्ला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने झाले. तर पहिल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने झाले. पहिल्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण मंत्र्यांची संख्या २० इतकी झाली असून अद्यापही २४ मंत्री पदे रिक्त आहेत. मात्र अद्याप दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संदोपसुंदी सुरु आहे. त्यातच मागील काही …

Read More »