Breaking News

Tag Archives: शिवसेना (ठाकरे गट)

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं ” सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप,… अपघात रोखण्यास सरकार अपयशी घटनेची चौकशी करून दोषी कारवाई करावी

समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या असून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज रात्री घडलेल्या अपघाताची दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी …

Read More »

उद्धव ठाकरे म्हणाले, केवळ जागा मिळतील म्हणून भाजपा सोबत आला …. गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुले उधळता मग समाजवाद्यांशी बोललो तर कुठे बिघडलं

महाराष्ट्राने मुंबई मिळवली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीत प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्यासह सर्वजण महाराष्ट्रासाठी एकत्रित आले. त्यावेळी तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपा कुठे होता. ते तर ना स्वातंत्र्य लढ्यात होते ना महाराष्ट्राला मुंबई मिळावी या लढ्यात होते. पण त्यावेळी होत असलेल्या निवडणूकांमध्ये काही जागा मिळतील म्हणून त्यावेळचा …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »

मुंबई भाजपाकडून वाघ नखांच्या निमित्ताने “शंखेखोराचा कोथळा काढण्यासाठी” मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानांचा वध करताना वापरलेली वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाच्या वतीने ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच – वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते डॉ. राहुल …

Read More »

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदे गटाचा ? दसरा मेळाव्या आडून पुनर्मिलनाची शक्यता

परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना बोलण्याचा काय अधिकार? चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवले त्यांना रजेच्या मुख्यमंत्र्यांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला अडीच वर्षे घरात बसून होते ते आज प्रश्न विचारतात हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे …

Read More »

अहिंसावादी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशीच पोलिसांकडून बळाचा वापर मै भी गांधी इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखली

आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या जयंतीचे औचित्य साधत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरण आणि मनमानी पध्दतीच्या कारभारा विरोधात इंडिया आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी मै भी गांधी ही पदयात्रा काढली. परंतु, सदरची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचताच …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, न्यायाला उशीर करणं फक्त आमच्यावर नाही तर… ट्विट करत केला राहुल नार्वेकर यांच्यावर वार

लोकसभा निवडणूका जवळजवळ येत आहेत. तसे राज्यातील अपात्र आमदारांबाबतचा निकाल लांबविण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत असा ठपकाही ठेवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ट्विटकरून निशाणा साधला. यावेळी …

Read More »

अनिल परब यांचा सवाल, आम्ही काय प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयातच जायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाईवर ठाकरे गटाचा आरोप

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पक्षांतरबंदी कायदा आणि आमदार अपात्रतेचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणीनंतर न्यायालयाने संबधित यंत्रणेवर ताशेरे ओढत बंडखोर आमदारांच्या अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे सांगितल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी करत प्रत्येक वेळी आम्ही …

Read More »