Breaking News

Tag Archives: आरोग्य विभाग

रूग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली …

Read More »

विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपावर अखेर आरोग्य विभागाचा खुलासा

मागील दोन आठवड्यापासून काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा गटाचे विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्याकडून आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सतत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर जवळपास आठभडानंतर आरोग्य विभागाने अॅब्युलन्स टेंडर निविदेतील घोटाळ्याप्रकरणी खुलासा आज केला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी अभियान

शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर ८ हजार कोटीपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम …

Read More »

अंबादास दानवे यांचा टीका, राज्यातील आरोग्यव्यवस्था मरणपंथाला

नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, ठाणे व कळवा येथील शासकीय रुग्णालयात औषधं व डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,या घटना राज्याला लाज वाटेल अशा आहेत. असे म्हणत राज्यातील आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे म्हणाले, खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा …

Read More »

आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिका-यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले होते. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेअंती संघटनेने आज आंदोलन मागे घेतले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत …

Read More »

महाराष्ट्रात ९ लाखांहून अधिक बालक ‘या’ आजाराने ग्रस्त  जागरूक पालक, सुदृढ बालक' अभियातर्गत लहान बालकांची तपासणी सुरु 

महाराष्ट्रात एकाबाजूला हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला राज्यातील बालके मोठ्या संख्येने आजारी असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ० ते १८ वयोगटातील ९ लाख ६४ हजार ३८४ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने …

Read More »

हवेची गुणवत्ता खालावल्याने थेट होतोय आरोग्यावर परिणाम मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणामुळे होतोय आरोग्यावर परिणाम

राज्यत थंडीची चाहूल लावलेली असताना दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे असा रिपोर्ट आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा

कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

केवळ या महिलांनाच मिळणार मातृ वंदना योजनेचा लाभ, जाणून घ्या अटी सुरक्षित मातृत्वासाठी ‘मातृ वंदना योजना 2.0’

दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गर्भारपणाच्‍या शेवटच्‍या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होऊन माता व बाल मृत्‍यू दरात वाढ झाल्‍याने ते नियंत्रित करण्‍यासाठी १ जानेवारी २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना कार्यान्वित करण्‍यात आली आहे. या योजनेची …

Read More »