Breaking News

पंतप्रधान मोदी, आमच्या नादीला लागू नका ! एल्गार मोर्चाच्या समारोपाप्रसंगी अँड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

देशाचा रखवालदार म्हणवून घेणाऱ्या रखलवादाराकडून आता रखवालदारी काढून घेण्याची वेळ आली असून या रखवालदाराला एकच सांगतो आमच्या नादी लागू नको. आम्ही फकीर आहोत. त्यामुळे आम्ही उद्या जेलमध्ये गेलो, तरी फरक पडणार नाही. मोदींना असे वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीला भिडे आणि स्वत:च फोटो टाकले म्हणजे झाले. मोदी, तुम्ही मुख्यमंत्री पादवर असताना काय कारवाया केल्या त्या माहीत आहेत. तुमचे डाग जे आहेत ते लोकांसमोर आणायला भाग पाडू नका असा इशारा देत भिडे तुमचा भिडू असेल आम्हाला त्याचे देणेघेणे नाही. पण तो दंगलखोर असून तर त्याला अटक करा असा सज्जड दम अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी असलेला संभाजी भिडे याला अटक करण्याच्या मागणीसाठी दलित समाजातील सर्व संघटनांच्यावतीने काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.  या मोर्चाला राज्यभरातून जवळपास ५० हजाराहून अधिक कार्यकर्त्ये सहभागी झाले होते.

या देशात मनमानी पध्दतीने वागून हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देत सत्तेवरून गेल्यानंतर तर हिटलरला मान देणारी त्याची मैत्रीण त्याच्या सोबत होती. पण तुम्ही तर तुमच्या बायकोला पण सोडलं आहे. हिटलरला सुद्धा स्वतःला गोळ्या घालून घ्याव्या लागल्यात. हिटलर पण स्वतःची मनमानी चालवत होता. मोदी तुम्ही सुद्धा स्वतःची मनमानी चालवत असल्याची टीका त्यांनी केली.

मोदी आम्ही तुझे कैदी होणार नाहीत हे लक्षात घ्या. मात्र आम्ही तुला कैदी करू असा गर्भित इशारा देत मोदी मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या हरियन पंड्या यांचा मर्डर झाला. त्याचा मर्डर गाडीमध्ये असताना झाला. म्हणून मोदी तुम्ही आमच्या नादी लागू नका, तुम्ही आड येणार असाल तर मेलेली मूडदे मसणातून देखील बाहेर काढू. मोदी ही मेलेली भूत बोलायची नसतील तर मुकाट्याने भिडेला अटक करा नाहीतर ही मेलेली मूडदी बोलायला लागतील असा सज्जड इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या खुनांची मालिका उघडकीस आणण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

१ जानेवारीला रावसाहेब पाटील याचा फेसबुकवर एक संदेश होता. आम्हाला भिडेचा आकडा गाठता आला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांचा खून करा असे त्याने फेसबुकवर लिहिल होते. हे पोलीस खाते आपल्या मुख्यमंत्र्यांना वाचवू शकत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्याला फेसबुकवर मारण्याची धमकी दिली जाते आणि हे पोलीस खात शांत झोपलं असल्याची टीकाही त्यांनी केली.

जर तुम्ही भिडला अटक केली नाही तर आम्ही विधान सभेला घेराव घातल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देत पुढच्या वेळेला येताना १०-१० भाकऱ्या सोबत बांधून आणा याना दाखवून दिलं पाहिजे आम्ही तुम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाही ते. आजच्या या जनसमुदायातून सरकार काही शिकेल असं समजू

आणि जर शिकलं नसेल तर पुन्हा शिकवायला येऊ असे जमलेल्या उपस्थित समुदायाला सांगत आपला हा लढा मोठा आहे. आपली ही माहिती घेतली जाते ती सुरक्षित नाही. बँकेचे खात काढायचं असेल तर आधार कार्ड मागतात. मोदी सरकारला आधार कार्डची माहिती कशाला हवी? असा सवाल करत मोदीना या देशातल्या ५० टक्के लोकांना ब्लॅक मेल करायचे आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे सरकार पुन्हा आले तर हा माईक नाही हा दंडा नाही आणि आपणही नाही म्हणून या सरकारला आपण इशारा देतोय की पुन्हा आम्हाला यायला लावू नका. पुन्हा आम्ही जर आलो तर आम्हाला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय ही मुंबई सोडणार नाही. हा लढा मोठा आहे हे मी मानतो. इथला मीडिया पण आपल्या बाजूने नाही. आपण फक्त सोशल मीडियावर दिसतो. वर्तमान पत्रात येतात ते सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात कार्यकर्ता हाच आपला वर्तमान पत्र आहे असे मानलं पाहिजे. आम्ही इशारा देण्यासाठी आलो होतो. आज पोलिसांचे आम्ही ऐकलं पुढच्या वेळी माझी दादागिरी चालेल असे सांगत पुढील लढा आणखी तीव्र असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *