Breaking News

राजकारण

संन्यास घेवू म्हणणारे, धनगर आरक्षणाचे काय झाले? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप

मुंबई, दि. २७ जून ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा …

Read More »

पंकजा मुंडेचा इशारा आरक्षण दिल्याशिवाय निवडणूका होवू द्यायच्या नाहीत ओबीसी चिंतनमंथन शिबीरात मांडली भूमिका

लोणावळा : प्रतिनिधी हे शिबीर निर्णय आणि निश्चयाचे आहे. 3-4महिन्याच्या आत empirical data तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. OBC च्या आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ न देण्यासाठी सरकारने न्यायालयात जावे अशी मागणी करत आरक्षण मिळाल्याशिवाय या निवडणूका होवू द्यायच्या नाहीत असा इशाराही भाजपाच्या राष्ट्रीय सचिव …

Read More »

सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नांदेड: प्रतिनिधी सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेकडून संभाजी राजेंचे कौतुक तर फडणवीसांना तिरकस बाण अनेकजण आदळआपट करत आहेत मात्र मी त्यावर बोलणार नाही

मुंबई: प्रतिनिधी संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका आहे असा टोला भाजपाला लगावत अनेकजण आदळआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत ओबीसी आरक्षणप्रश्नी …

Read More »

#BreakTheChain अंतर्गत सोमवारपासून फक्त या गोष्टींना परवानगी ! कोविड-19 निर्बंधांशी संबंधित विविध बाबींचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ,खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता  येणार नाही. जमाव/ मेळावे 1- जमावाची व्याख्या ‘एका सामुहिक कारणासाठी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले भाजपा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी …

Read More »

भाजपाचे ‘जेलभरो आंदोलन’ म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण …

Read More »

खडसेंचा भाजपाला खोचक सल्ला “त्या” नेत्याचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा ओबीसी आरक्षणप्रश्नी आक्रमक झालेल्या भाजपावर रोहिणी खडसेंचे टीकास्त्र

मुक्ताईनगर-मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनालाच  जोडूनच भाजपामधल्या “त्या” ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकिय बळी का घेतला? ते पण सांगा असाल खोचक सल्ला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपाला ट्विटरवरून दिला. भाजपामधील ओबीसी …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे आव्हान, भुजबळ, वडेट्टीवार, पटोले कोणीही या चर्चेला ओबीसी आरक्षणाप्रश्नी भाजपाने दिले आव्हान

कोल्हापूर: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे नेते केंद्र सरकारबद्दल करत असलेली तक्रार चुकीची आहे. ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गमावले या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी कोल्हापुरात बिंदू चौकात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जाहीर चर्चा करावी म्हणजे लोकांना सत्य कळेल, असे आव्हान …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपाचे चक्काजाम आंदोलन ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही

राज्यभरातून: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री …

Read More »