Breaking News

Tag Archives: ncp

भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत छगन भुजबळ यांचे आवाहन भिवंडी: प्रतिनिधी हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा- आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी करत विकासाचा मुद्दा बाजुला ठेवुन भाजप सरकार मंदिर मस्जिदीचा मुद्दा घेवून सरकार धंदा करत आहे. राम रहीम …

Read More »

अच्छे दिनाचे स्वप्न दाखवित जनतेची फसवणूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची टीका  रायगड- महाड : प्रतिनिधी ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली…लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी …

Read More »

पंकजा मुंडे या दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची खोचक टीका  मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

भविष्यात एससी-एसटीचे आरक्षण रद्द करणार का?

खुलासा करण्याची राष्ट्रवादीची मागणी  मुंबई: प्रतिनिधी  गोळवळकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमध्ये ही संकल्पना आहे. ती जी संकल्पना असताना जे एससी, एसटी यांची आरक्षणे रद्द केली पाहिजे असा संघाचा दावा आणि त्यांची भूमिका होती. सरकारने स्पष्ट केले पाहिजे की त्याची सुरुवात या देशात या सरकारच्या माध्यमातून सुरु झाली आहे का ? भविष्यकाळामध्ये एससी, एसटीचे आरक्षण …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी नयनतारा सहगल यांची क्षमा मागावी

सन्मानाने बोलविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी  मुंबई : प्रतिनिधी नयनतारा सहगल यांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर रद्द करण्यात आलेला आहे. जर तसं नसेल तर राज ठाकरे यांनी मन मोठं करुन क्षमा मागितली तसं मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करुन नयनतारा सहगल यांची क्षमा मागून त्यांना पुन्हा निमंत्रण दिले पाहिजे. सन्मानाने …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांना आशावाद  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रामध्ये …

Read More »

शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला  मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका …

Read More »

तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल  मुंबई : प्रतिनिधी टोमॅटोला…कांदयाला भाव नाही…दुधाला अनुदान नाही…शेतकऱ्यांनी मग करावं काय ? निवडणूका जवळ आल्यावर महत्वाच्या मुद्दयांना बगल दिली जाते. तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला असा संतप्त सवाल सरकारला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार …

Read More »

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाला विदर्भात न जाण्याचे आदेश राष्ट्र्वादी काँग्रेसचे शरद पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही …

Read More »

कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला. गुरुवारी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही …

Read More »