Breaking News

Tag Archives: वंचित बहुजन आघाडी

उत्कर्षा रूपवते शिर्डीतून ‘वंचित’कडून रिंगणात

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली आहे. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर साताऱ्यातून माजी सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, NRC आणि CAA कायदा मुस्लिम नव्हे तर VJNT विरोधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न

भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, …भाजपासोबत दोन हात करून मोकळं होवू

शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजपा हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपासोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही …

Read More »

राज्यात पुन्हा गांधी विरूध्द आंबेडकर राजकीय वाद

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना आगामी निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे जाहिर वक्तव्य केले. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गांधी विरूध्द आंबेडकर असा वाद पाह्यला मिळाला. तुषार गांधी यांनी केलेल्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे सूचक विधान, एकाबाजूला चीन अन्…

स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भाजपचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, मविआतील नेत्यांमध्येच ताळमेळ नाही

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आपण काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले होते. पण त्यांचा नेता इथे नसल्याने त्यांना या संदर्भात निर्णय घेता आला नाही. परंतु मागील दोन तीन दिवसांपासून काँग्रेसकडून जो वार्तालाप होत आहे, आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही होत आहे आहे. यावरून एकच दिसून येते की, ते …

Read More »

वंचितने केली मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, वंचितने सातत्याने अपमान केला… देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन …

Read More »