Breaking News

Tag Archives: अशोक चव्हाण

अजित पवार यांचे आदेश, नांदेड जिल्ह्यातील कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठाच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असणारी पाणीपुरवठा योजनांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली, राजीनामा स्विकारा पक्षात काम करण्याची पूर्ण मोकळी द्यावी केंद्रातल्या नेत्यांना भेटून सांगणार

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी नुकतीच झाली. या निकालात महाराष्ट्रातील लोकसभेच्या २३ जागांवर असलेली भाजपा अवघ्या ९ जागांवर आली. या पार्श्वभूमीवर या पराभवाची जबाबदारी स्विकारत भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी स्विकारत राजीनामा स्विकारण्याबाबात केंद्रीय नेतृत्वाला सांगणार असल्याचे सांगत पूर्ण वेळ पक्षाचे काम करण्यासाठीची जबाबदारी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून आयारामांना उमेदवारी, निष्ठावंत मात्र वंचितच

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका …

Read More »

महायुतीचे उमेदवार जाहीर, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरा, डॉ गोपचडे

राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून काहीसे अडगळीत गेलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा आणि सध्या मराठवाड्यातील मराठा विरूध्द ओबीसी राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आगामी खासदारकीचे तिकिट मागील महिन्यातच बुक करून ठेवले. तर काही …

Read More »

काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …

Read More »

अशोक चव्हाण यांनी नव्याने धारण केले कमळः काँग्रेस नेमकी चाललीय कुठे?

मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. …

Read More »

अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती, राजीनामा दिला, पण निर्णय दोन दिवसानंतर

राज्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ख्याती असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यातच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशोक चव्हाण यांच्या …

Read More »

संजय राऊत यांची टीका, आता अशोक चव्हाणही हात चिन्हावर दावा करणार का?

राज्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहभागी पक्षाच्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यावर खोचक टीका केली. यावेळी संजय …

Read More »

पराभवाच्या छायेत असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री पद भूषविलेले अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अनेक नेते पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यातच अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण …

Read More »

काँग्रेस म्हणते, भाजपाला फक्त ३० टक्के, तर ७० टक्के मते…..

भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे …

Read More »