Breaking News

राज्यात पावसाचा जोर ओसरला पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवायेलो अलर्ट नाही

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसारराज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिताराज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४७६ क्युमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ५१०१.०२क्युमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८क्युमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग

धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत २४ क्युमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१  क्युमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १४१क्युमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्युमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २४३ क्युमेक्स विसर्ग

कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३९ क्युमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ४७ क्युमेक्स विसर्ग

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठीदुपारी ३:१५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४.५ मीटर पर्यंतसमुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळीओलांडलेली आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातीलनागरिकांनी अद्ययावत व सतर्क  राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲपडाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना २० ते ४० किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करतेतसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टलच्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.आपत्ती संबंधित  माहिती व मदतीसाठीनागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्यासोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077(टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ई- मेल: [email protected]

महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून  ५ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार  महाराष्ट्र: हवामान सद्य:स्थिती आणि अंदाजप्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *