मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता …
Read More »साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य आणि साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत …
Read More »राज्यात पावसाचा जोर ओसरला पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवायेलो अलर्ट नाही
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसारराज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिताराज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) …
Read More »मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलांवामध्ये किती आहे पाणी साठा पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार की तसाच पुढे सुरु राहणार
मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये वापरा योग्य कमी पाण्याचा साठा राहिला. यापार्श्वभूमीवर पाणी कपातीचा निर्णय मुंबई महानगरापालिकेने घेतला होता. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही भागात सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आणि धरणक्षेत्रात थोडा थोडा करीत आता ५०.१८ टक्के पाणी …
Read More »हवामान खात्याने दिला इशाराः या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे सह विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. Active monsoon …
Read More »पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती
मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती …
Read More »आजचा दिवस मान्सूनचाः २०० हून अधिक मिमी मान्सून बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बरसणार
आधीच राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सून पावसाने जूनच्या अखेरीस येऊनही जून महिन्यातील तूट भरून काढल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जुलै महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाने अद्याप मुंबईसर राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढावले असण्याची …
Read More »पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आरोग्य मंत्री डॉ. सावंतांनी घेतला आढावा जोखीमग्रस्त गावांसाठी शीघ्र प्रतिसाद पथके तत्पर ठेवा
राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसाळ्यात साथरोगाच्या दृष्टिकोनातून जोखीमग्रस्त गावे ओळखून यादी करावी. त्याप्रमाणे गट तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रा. डॉ .तानाजी सावंत यांनी दिल्या. पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गावपातळीपर्यंत केलेल्या …
Read More »पाऊस तर आला पण पेरणी कधी करायची? कृषी आयुक्तांनी दिला शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला राज्यात बियाणे, खतांचा मुबलक साठा पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी- कृषी आयुक्त सुनील चव्हाण
खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामाकरिता …
Read More »आदित्य ठाकरे यांची त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका, मुंबईत असा निर्लज्जपणा…..
मुंबईत पहिल्या पावसानंतर पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाणी साचलं हे काय सांगता, पाऊस आला याचं स्वागत करा असं वक्तव्य केलं. यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत मुंबईत एवढा निर्लज्जपणा आणि नाकर्तेपणा कधीच पाहिला नाही, असं म्हणत टीका केली. शिवसेना …
Read More »