मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »परिक्षा रद्द प्रकरणी शरद पवारांकडून मुख्यमंत्र्याचे समर्थन राज्यपाल कोश्यारी यांनाही लगावला टोला
रत्नागिरी (दापोली) : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जगातील ऑक्सफर्डसह इतर नामांकित विद्यापाठांनी त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती कदाचित राज्यपाल महोदयांना जास्त असेल असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन केले. राज्यावर आलेल्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम …
Read More »पूर्ण महिन्याचा पगार पाहिजे तर मंत्रालयात या अन्यथा….. पैसा नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना बिन पगारी रजा देण्याची कामगार विभागाची शिफारस
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरअर्थ काढत मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियमानुसार मुख्यालयाला न कळविताच परस्पर गावी जावून बसले आहेत. अशा विना परवानगी गावी गेलेल्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्याची शिफारस करत मंत्रालयात प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन द्या अन्यथा घरी बसून …
Read More »निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन
श्रीवर्धन: प्रतिनिधी मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य …
Read More »शरद पवार दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील 'निसर्गा' चा तडाखा बसलेल्या गावांची करणार पाहणी
मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ९ जून …
Read More »६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …
Read More »महाराष्ट्र प.बंगाल बनू पाहतोय का ? मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे
मुंबई: विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. मात्र त्या राज्याच्या राज्यपाल पदी जगदीप धंखार यांची नियुक्ती झाल्यापासून मुख्यमंत्री बॅनर्जी विरूध्द राज्यपाल असा सामाना सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. अगदी त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ …
Read More »कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …
Read More »मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. …
Read More »संभावित संकटे-परिस्थितीवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, मंत्र्यांची चर्चा लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करण्याला प्राधान्य
लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य …
Read More »