Breaking News

Tag Archives: काँग्रेस

विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे दिला मुख्यमंत्र्यांना इशारा, …अशी पळवाट सरकारने

वैधानिक विकास महामंडळामुळे विदर्भ, मराठवाडा आणि इतर मागास भागाला हक्काचा निधी मिळत होता. आता वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, तज्ञ, अभ्यासक यांच्या नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनुशेषाचा अहवालच सादर होत नाही. वैधानिक विकास महामंडळ नसल्यामुळे आज अनुशेषाचे मोजमाप करता येत नाही. सरकारने अनुशेष नाही अशी पळवाट न काढता तात्काळ विदर्भ व …

Read More »

“शासन आपल्या दारी” म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना “शेतकरीपुत्राचे रक्तपत्र”

आमचा शेतकरी बाप रात्रं-दिवस शेतात राबतो. दिवसा वीज नसल्याने रात्री साप, विंचूंना न घाबरता पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जागतो. इतके करूनही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. कापूस, सोयाबीनचा बाजारातील भाव कोसळले. आर्थिक अडचण वाढल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. ही व्यथा आहे यवतमाळ जिल्ह्याच्या वाईरूई येथील कुणाल जतकर या शेतकरी पुत्राची. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात ४७९ किमीचा प्रवास

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. भारत जोडो यात्रेतून देश जोडण्याचे जे काम झाले तेच काम या यात्रेतूनही होणार असून जनतेच्या न्याय हक्काला वाचा फोडण्याचे काम …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, अब्दुल सत्तार मंत्री आहे की गुंड?

पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांचा आणखी एक मस्तवालपणा महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाला. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यांना आवरण्यासाठी या मंत्री महाशयांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचेच आदेश दिले. धक्कादायक म्हणजे “या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडे मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त …

Read More »

महाराष्ट्राचा ब्रॅड ‘महानंद’ दूध आता गुजरातच्या दावणीला बांधला

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…

देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, MPSC च्या परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन केल्याचा बदला…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »

काँग्रेसची मागणी,… तो जुलमी मोटार वाहन कायदा रद्द करा

केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला काँग्रेसचा पाठिंबा …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार, …वंचितचा समावेश होण्याच्या भीतीनेच… आघाडीसंदर्भातील चर्चा कोणी नेता पत्रकारासमोर करेल का?

देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर देशपातळीवर इंडिया आघाडी होत आहे व राज्यात महाविकास आघाडी अभेद्य आहे. यात वंचित बहुजन आघाडी जोडली जाणार असल्याच्या भीतीने भाजपाला पोटशूळ उठला म्हणून दिशाभूल करणारी माहिती काही सुपारीबाज पत्रकार पसरवत आहेत, असा पलटवार काँग्रेस …

Read More »