Breaking News

भारतात बनवली जाईल जगातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप चीनचा दबदबा मोडीत काढण्यासाठी भारताचे एक पाऊल पुढे

तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनचा दबदबा आजही जगभरात कायम आहे. या वर्चस्वाच्या जोरावर चीन प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवत असून आता चीनचे युग संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण भारताने तंत्रज्ञानाच्या दुनियेत आपले पाय आणखी खोलवर रोवले आहेत. चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी भारताने ‘मेड इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मोबाइल फोनचे भारतीय बनावटीचे उत्पादन सुरू केले. याचा असा परिणाम झाला की, आज भारत मोबाईल निर्मितीचे मोठे केंद्र बनले आहे. सध्या ते वार्षिक ३.५ लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन बनवत आहे.

तसेच, यावर्षी २०२३ हा आकडा ४ ते ४. लाख कोटी रुपये असू शकतो. याशिवाय ते मोबाईल फोन्सचे उत्पादन करत आहे. मोबाईल फोन नंतर आता भारत सेमीकंडक्टर (अर्धवाहक) बनवणार आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी Google for India कार्यक्रमात सांगितले की, भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर प्लांटचे बांधकाम सुरू झाले आहे, जे येत्या काही वर्षांत चिपसेटचे उत्पादन सुरू करेल. भारताच्या या पावलावर चीन नाराज असून भविष्यात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती चीनला निर्माण झाली आहे.

चीनी कंपन्यांनी दीर्घकाळ यावर आपले वर्चस्व गाजवले आहे. मात्र चीनच्या वर्चस्वातून सुटण्याचा मार्ग भारताने शोधला आहे. दुसरीकडे, अमेरिकेनेही चीनबाबत नवा नियम आणला आहे, ज्याअंतर्गत अमेरिकन टेक कंपन्या चीनला सेमीकंडक्टर किंवा त्यांचे पार्ट्स निर्यात करू शकणार नाहीत, तर अमेरिकेच्या सहकार्याने भारतात सेमीकंडक्टरची निर्मिती केली जात आहे.

काय आहे सेमीकंडक्टर

सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉन-प्रवाहामुळे विद्युतवाहकता संभवणारा असा पदार्थ असतो, ज्याची वाहकता विद्युतवाहक व अवरोधक यांच्या मधली असते. सहसा सेमीकंडक्टरची वाहकता १०३ ते १०-८ सीमेन्स प्रति सें.मी. एवढी असते. रेडिओ, संगणक, दूरध्वनी इत्यादी उपकरणांमध्ये व एकंदरीतच आधुनिक इलेक्ट्रॉनिकीमध्ये सेमीकंडक्टर पायाभूत घटक आहेत.

 

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *