Breaking News

राजकारण

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका नाहीतर महागात पडेल असा सज्जड धमकीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका दूरचित्रवाणीवरून दिली. देशातील पाच राज्यांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणूकीच्या निकालावर एका दूरचित्रवाहिनीवर चर्चा सुरु होती. …

Read More »

केरळवासियांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास तर पंढरपूर-मंगळवेढ्यात अविश्वास आमचा थोडक्यात पराभव - जयंत पाटील

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३७०० मतांनी पराभव झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाले. मात्र राष्ट्रवादी …

Read More »

भाजपाबाबतची शरद पवारांची भविष्यवाणी अखेर झाली खरी तीन राज्यातील दारूण पराभव होणार असल्याचे भाकित

मुंबई: प्रतिनिधी देशातील पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, पाँडीचरी, आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर या पाचही राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार असल्याचे भाकित केले होते. …

Read More »

आणि पंतप्रधान मोदींचे ममता बॅनर्जी यांच्याबाबतचे भाकित खरे ठरले पश्चिम बंगालमध्ये तृणमुल आघाडीवर मात्र ममता बॅनर्जी पराभूत

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीची घोषणा सुरु झाल्यानंतर साधारणत: मार्च महिन्याच्या पहिल्या १० दिवसात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारा दरम्यान भाकित केले होते. ते भाकित आज मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या पराभवाने अखेर खरे ठरले. साधारणत: ८ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमध्ये सभा झाली. …

Read More »

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक टन एवढी डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थ्यांना वाटलीच नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? असा सवाल केंद्रीय अन्न धान्य व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. गेल्या वर्षी लॉकडाऊन …

Read More »

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत प्रतिक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे जाहीर केले. लस अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट …

Read More »

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडिसिवर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. …

Read More »

राज्यपाल म्हणाले, संकटावर मात करत राज्याच्या प्रगतीसाठी आघाडी सरकारचे कार्य नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या …

Read More »

केंद्र मोफत लस देणार म्हणणाऱ्यांनी माहिती तपासून घ्या; १८ ते ४४ ची जबाबदारी राज्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विरोधकांना टोला लगावत ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र काहीजण केंद्र सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याची चुकिची माहिती पसरवत आहेत. त्यामुळे त्यांनी माहिती तपासून घ्यावी असा टोला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावत १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राष्ट्रवादीचा खारीचा वाटा ; दोन कोटीची मदत… यामध्ये राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या एका महिन्याच्या वेतनाचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही …

Read More »