Breaking News

आरोग्य

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन : जनतेने खबरदारी घ्यावी आम्ही जबाबदारी घेवू १५ दिवसांनी वाढणार असल्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरु ठेवण्याची भूमिका राज्याच्यावतीने मांडण्यात आली. त्यामुळे या आजाराची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडण्यासाठी राज्यातील जनतेने खबरदारी आम्ही जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना

 मुंबई : प्रतिनिधी खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी …

Read More »

मुंबई, पुणेकरांनो आकडा वाढतोय, रूग्णग्रस्तांचा आणि मृतकांचाही राज्यात २२९ नवे रूग्ण, तर २५ जणांचा मृत्यू : आकडा १३६४ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. एकट्या मुंबईत १६२ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल पुण्यात आढळून आले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नाशिकसह इतर ठिकाणच्या रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. तर आज दिवसभरात राज्यातील २५ रूग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २२९ रूग्णांची …

Read More »

LOCKDOWN- एक संधी मानसशास्त्रज्ञ संध्या काळे यांचा खास लेख

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. हा संसर्ग लवकर कमी व्हावा असे वाटत असेल तर सर्वांनीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत. “सोशल डिस्टनसिंग “, पर्सनल हायजिन , फार महत्त्वाचे आहे . एक मानसशास्त्रज्ञ म्हणून सांगायचे झाले तर या “लॉकडाऊन” कडे  संकट कमी आणि संधी जास्त असे पहायला …

Read More »

मोठ्या शहरांमध्ये मोबाईल तर तालुकास्तरावर रक्षक क्लिनिक महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसल्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा निर्वाळा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक खाजगी रूग्णालयांनी आणि डॉक्टरांनी स्वत:ची क्लिनिक बंद केल्याने राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या इतर आरोग्याच्या तक्रारीवर इजाल होईनासा झाला. त्यामुळे ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) तालुकास्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक सुरू आणि मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करणाचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

हाफकिनने पास केले तरच पीपीई किट व एन-९५ मास्क विका-वापरा अप्रमाणित उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या पी.पी.ई. किट व एन-९५ मास्कचे उत्पादन व विक्री करण्यापूर्वी हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळाकडून त्यांचा दर्जा व गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. दर्जा व गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट व मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून अशा …

Read More »

कोरोना (तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाला) ने गुणाकार सुरु केलाय…दक्ष रहा तीन पध्दतीच्या रूग्णालयांची स्थापना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडून चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. रोजचे कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंताजनक असून या आजाराने आता गुणाकार पध्दतीने अर्थात तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाल्याचा इशारा देत दक्ष रहा, सतत मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत चीनच्या वुहान प्रांतातील सर्व निर्बध ७०-७६ दिवसानंतर उठविण्यात …

Read More »

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश ? राज्याने हजाराचा टप्पा ओलांडला रूग्ण १०१८ वर पोहोचले, सर्वाधिक पुन्हा मुंबईत

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राने आता अधइकृतरित्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्याचे स्पष्ट होत असून काल १२० नव्या रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज पुन्हा १५० रूग्णांचे निदान झाले. यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून त्यांची संख्या ११६ आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार १८ वर पोहोचली. राज्यात दिवसभरात मुंबई ११६, पुणे-१८, …

Read More »

राज्यातील सर्व शासकिय आणि खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्ष कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी राज्यातील सर्वच शासकिय आणि खाजगी रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, …

Read More »