Breaking News

एलआयसी आयपीओ का आहे खास ? जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठ्या आयपीओबद्दल

मुंबई : प्रतिनिधी

शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) कमाई करण्याची चांगली संधी गुंतवणूकदारांना असते. कमी वेळेत आणि कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवण्याचा आयपीओ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आयपीओकडं लागलेलं असत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी – LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओकडं शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल. केंद्र सरकारने एलआयसीच्या आयपीओतून ९० हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आय़पीओ येण्याआधी एलआयसीची माहिती गुंतवणूकदारांना असणं आवश्यक आहे. यामधून हा आयपीओ किती महत्त्वाचा आहे हे समजून येईल. एलआयसीचे देशभरात १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी, १२ लाखांहून अधिक एजंट आणि ३० कोटी पॉलिसीधारक आहेत. देशभरातील २००० हून अधिक कार्यालयांमार्फत एलआयसी आपला कारभार पाहते. देशांतर्गत विमा बाजारात  एलआयसीचा दोन तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा आहे

सरकार एलआयसीमधील काही हिस्सा विकत आहे. यासाठी आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे. एलआयसीचा हा आयपीओ विमा उद्योगातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्यांमधील आपला हिस्सा विकून १.७५ लाख कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. एलआयसीचा आयपीओ हासुद्धा त्याच निर्गुंतवणुकीचा एक भाग आहे. एलआयसीमधील आपला काही हिस्सा विकल्याशिवाय सरकारला निर्गुंतवणुकीचं हे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही.

हा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल, संपूर्ण देशातील गुंतवणूकदारांच्या नजरा या आयपीओवर असेल. त्यामुळे निश्चितच हा आयपीओ कुबेराच्या खजिन्यापेक्षा कमी नसेल.  विशेषतः ज्या गुंतवणूकदारांची एलआयसीमध्ये पॉलिसी आहे त्यांना याचा अधिक फायदा होईल. याचं कारण म्हणजे या आयपीओमध्ये एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठीही १० टक्के शेअर्स राखीव असणार आहेत. सरकारने याची घोषणा आधीच केली आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना एलआयसीच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने ठेवण्यासाठी सरकारला एलआयसी कायदा १९५६ मध्ये सुधारणा करावी लागली.

आयपीओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेल्या बँकर्समध्ये गोल्डमॅन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, एक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लि. चा समावेश आहे. आयपीओमधील शेअर्स कोणत्या किंमतीला बाजारात आणले जातील हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र, प्राईस बाँड ४०० ते ६०० रुपये प्रति शेअर असू शकते, असा शेअर बाजार तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *