Breaking News

हवामान

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने …

Read More »

उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त …

Read More »

प्रदूषण रोखूया.. चला ‘ईव्ही’ वापरूया वातावरणीय बदल आणि पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर खास लेख

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या प्रयत्नांना हातभार लावूया… वातावरणीय बदलांचे गंभीर परिणाम आता जगभरातील नागरिक अनुभवत आहेत. उष्णतेमधील वाढ, वारंवार येणारी चक्रीवादळे, अतिवृष्टी …

Read More »

स्कायमेट म्हणते, भारतीय हवामान खात्याची “ती” माहिती चुकीची केरळात मान्सून दाखल नाहीच

वाढत्या उन्हाच्या काहिलीने संपूर्ण भारतीय त्रस्थ झालेले असताना कधी एकदा मान्सूनचे आगमन होते आणि वातावरणात बदल होवून दिलासा मिळतो याची वाट पहात असताना नुकतेच भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहिर केले. मात्र भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेली माहिती चुकीची असल्याचा दावा स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केली. त्यामुळे …

Read More »

हवामान खात्याने दिली आनंदाची बातमी; केरळात तीन दिवस आधीच मान्सून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची धीमी वाटचाल

मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कधी होते मान्सूनच्या पावसाचे आगमन याची उत्सकुता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागल्याने किमान काही काळ तरी हवेत गारवा निर्माण होतो. परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे सुर्याच्या उष्ण किरणांनी चांगलीच …

Read More »

उखाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात लवकरच मान्सून: फक्त पाच दिवस बाकी १५ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाची शक्यता

मागील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतात तापमानात वाढ झालेली असल्याने उन्हाच्या रखरखीने राज्यातील जनतेला चांगलेच हैराण करून सोडले. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर वातावरणात थोडासा गारवा निर्माण व्हावा यासाठी मान्सूनच्या सरी कधी कोसळतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असताना मान्सूनने अंदमानच्या बेटावर आपली हजेरी …

Read More »

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक घटकाने वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. ‘क्लायमेट चेंज 2.0 – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावरील …

Read More »

देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. एम महापात्रा

मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा आगामी मे महिन्यात सुर्य आग ओकणार असल्याचा इशारा देत येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मे महिना हा वर्षातील …

Read More »

वरुणराजाच्या आगमनाने छत्र्या बाहेर तर थंडी पळाल्याने स्वेटर कपाटात अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ

मुंबई: प्रतिनिधी डिसेंबर महिना म्हटलं की गुलाबी थंडीचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. मात्र पर्यावरणातील बदलामुळे यंदा डिसेंबर उजाडला तरी वरूणराजाने अजून एक्झिट घेतली नाही. त्यामुळे आज महिन्याचा पहिला दिवस असताना मुंबईत सकाळपासूनच ढगांनी गर्दी  करत वरूणराज्याचे आगमन झाले. त्यामुळे सुर्यनारायणाला ढगांच्या आड लपण्याची नामी संधी मिळत सुट्टीवर जाणे भाग पाडले. …

Read More »

एसटी बस होणार आता प्रदुषण मुक्त : या इंधनावर धावणार डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. महामंडळावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. कोरोना …

Read More »