Breaking News

Tag Archives: wintersession

ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा महिनाभरात निश्चित करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. …

Read More »

शेतीमाल किंमती आणि बोंडअळी नुकसानीचा प्रस्ताव केंद्राकडे नाहीच राज्य सरकारकडून उत्तर न आल्याने विरोधकांचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी सातत्याने गळा काढणाऱ्या भाजप सरकारने शेतीचा दर ठरविण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना केली. मात्र या कृषी आयोगाने राज्यातील शेती मालाचा हमीभाव ठरविण्याचा प्रस्ताव आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला नसल्याचा खुलासा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग …

Read More »

गुजरातला पाणी देण्यावरून विधानसभेत गोंधळ पाणी अडविण्यासाठी केंद्राकडे १० हजार कोटी मागितल्याची मंत्र्यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या हिश्शाचे पाणी रोखण्याऐवजी ते गुजरातला देण्यात येत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकच गोंधळ घालत पाणी चोर, पाणी चोर भाजप पाणी चोरच्या घोषणा देत विधानसभेचे सभागृह दणाणून सोडत सरकारला चांगलेच धारेवर धरले. या गोंधळातच जलसंधारण मंत्री गिरिष महाजन यांनी दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पासाठी …

Read More »

ओखी वादळग्रस्तांना पंचनाम्यानंतर मदत देणार मदत जाहीर करण्यास सरकारची चालढकल

नागपूर : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकणातील आंबा, काजू आणि मच्छिमार उत्पादकांचे नुकसान झाले. या वादळग्रस्तांना राष्ट्रीय आप्तकालीन परिस्थिती अर्थात एनडीआरएफमध्ये येत नसल्याने या विभागातून नुकसान भरपाई देता येणार नाही. मात्र पंचनामे करून एसडीआरएफ अर्थात राज्य आपतकालीन परिस्थितीतून नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगत नेमकी किती नुकसान भरपाई देणार …

Read More »

बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणार आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचे आश्वासन

नागपुर : प्रतिनिधी नाशिक व गोरखपुर या दोन्ही धटना परस्पर विरोधी आहेत. गोरखपुरची घटना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाली. तर नाशिक मधील घटना काही त्या शहरातली नाही. ठाणे, पालघर, धुळे या आदीवासी पट्ट्य़ातील कुपोषित बालके उपचारार्थ नाशिकमध्ये येतात. यामध्ये जन्मता मृत्यू किंवा जन्मा अगोदर मृत्यू दरामध्येही फरक आहे. वातावरणातील फरक याला कारणीभूत …

Read More »

राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर

नागपूर: प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात …

Read More »

हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरात ? अंतिम निर्णय चर्चेअंती घेणार असल्याचे सां. कार्यमंत्री बापट यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशन साधारणत: तीन ते चार आठवड्याचे असते. त्यामुळे या कालावधीत सर्वच बाबींवर सविस्तर चर्चा करता येणे शक्य असल्याने नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन घेण्याबाबतचा एक नवा प्रस्ताव पुढे आला असून याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकारांशी …

Read More »

शेतकऱ्यांच्या फसवणूकीबद्दल सरकारवर गु्न्हा दाखल करा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-२०१७ या कर्जमाफीच्या योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट नावे आहेत. यासंदर्भातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे. मुख्यमंत्र्याकडून एकाबाजूला बँकांची नावे घेतली जात असताना दुसऱ्याबाजूला माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवाची बदली सरकारकडून केल्याने या संपूर्ण कर्जमाफी …

Read More »

मुंबईसह राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार संरक्षण पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आश्वासन

नागपूर : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, एमएमआर क्षेत्रातील आणि राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्यात यावे असे निर्देश ता‍तडीने सर्व महापालिकांना देणार असल्याचे सांगत रेल्वे हद्दीतील विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनाही लवकरच कळ‍वण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याचतबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या …

Read More »

कामगाराला अपघात घडल्यास ठेकेदारासोबत व्यावसायिकालाही सहआरोपी करणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्याचे काम सुरु असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यापार्श्वभूमीवर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात होवून बांधकाम करणारा कामगारास दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडल्यास बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री …

Read More »