मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …
Read More »ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण द्यायला पाहिजे. केंद्र सरकारने १० टक्के मराठा समाजाला अर्थिक मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण देताना ५० टक्के अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला अतिरीक्त आरक्षण देण्यात काय अडचण आहे. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुणे काँग्रेस …
Read More »‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक नाना पटोले म्हणाले, ... मोदींचा पराभव करणे हाच उद्देश
देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, गुरुजीचा पुरावा आहे का, तर फडणवीस यांचे प्रत्युत्तर, तुमच्या नावात बाबा…. भिडे यास गुरुजी म्हणण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये रणकंदन
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी मुद्याच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. त्या लक्षवेधीवर निवेदन करताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत सदरहू व्यक्ती हा स्वतःला फर्ग्युसन …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धरले धारेवर, राष्ट्रपित्यांचा अवमान करणारा भिडे बाहेर कसा? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कारवाई कऱण्याचे सरकारला आदेश
एखाद्या व्यक्तीने जर देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात जर कोणी अवमानकारक टीपण्णी केली असेल तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करायला हवी. मात्र सांगली येथील भिडे हा राष्ट्रपित्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करूनही त्याच्यावर राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तो व्यक्ती अद्याप बाहेर कसा ? …
Read More »भुजबळांपाठोपाठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही राष्ट्रवादीबाबत प्रश्नचिन्ह भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाण्यास तयार होती
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंडखोरी केली. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. त्यामुळे आता शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार अशा …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा घणाघात, भाजपा म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे…
भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे?… बॉलिवूडसह सर्व नामांकित लोकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदार बृजभूषणला अटक होत नाही. …
Read More »शरद पवार यांचा सवाल, त्यांची कॅटेगरी कोणती? , तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते मोठे नेते ते बोलले… काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रंगला कलगीतुरा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच त्यावरून खुद्द शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आज …
Read More »काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही भाजपाशी आतून बोलणी सुरु, किती दिवस सोबत राहतील माहिती नाही
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीची भाजपासोबत बोलणी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे माहिती नाही. तसेच राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने …
Read More »