Breaking News

Tag Archives: osmanabad

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिर ओमराजे निंबाळकर -भावजय अर्चना पाटील यांच्यात लढत

उस्मानाबाद पूर्वीच्या तर आताच्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर अर्थात पद्मसिंह पाटील यांच्या बंधुचे सुपुत्र यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नसल्याने अखेर भाजपा आमदार राणा जगजीत पाटील यांच्या …

Read More »

अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबतचे केंद्राचे पत्र केले जाहिर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव होणार

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर होणार आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला …

Read More »

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केवळ ‘त्या’ गोष्टीसाठी उद्या शिक्कामोर्तब नामांतराचा निर्णय बेकायदेशीर होता मात्र आता तो कायदेशीर होणार

शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मात्र राज्य सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

“त्या” निर्णयावर संजय राऊत यांचा सवाल, औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? तर हे हिंदूत्व आणि महाराष्ट्र द्रोही सरकार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर आणि नवी मुंबईतील दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह पाच निर्णयांना स्थगिती दिल्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

शरद पवार म्हणाले, ‘तो’ विषय अजेंड्यावर नव्हता; श्रीलंकेतील परिस्थितीचा बोध घ्यावा पण तो निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असल्याने मान्य करणे भाग

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत धाराशिव आणि औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. मात्र तो विषय आमच्या तिन्ही पक्षाच्या कॉमन मिनिमन प्रोग्राममध्ये नव्हता. इतकेच नव्हे तर त्या विषयावर आमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र त्याबाबत निर्णय झालेला नव्हता. हा निर्णय घेतल्यानंतरच तो विषय आम्हाला माहित झाल्याची माहिती …

Read More »

अबु आझमी यांचे आव्हान, नावं बदलण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शहर वसवा उध्दव ठाकरेंवर साधला निशाणा

शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडत भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी बोलाविलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी म्हणाले, …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी आर्थिक धीर देणारा भेटला ‘आदर्श’ चिमुकल्याने दिले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

मुंबई : प्रतिनिधी ‘आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रक्कमे इतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या …

Read More »