Breaking News

Tag Archives: nrc

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, NRC आणि CAA कायदा मुस्लिम नव्हे तर VJNT विरोधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते. यावेळी …

Read More »

बिदरच्या धर्तीवर मुंबईतील शाळा चालकांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केल्यावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपशासित राज्यात सीएएविरोधात …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्रे, सर्वोच्च न्यायालयात याचिका आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने ५ हजार याचिका दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नागरीकत्व कायदा, नागरीक नोंदणी आदी कायद्यांच्या विरोधात कल्याण मधील आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना १० हजार पत्रे तर सर्वोच्च न्यायालयात ५ हजार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मंचचे समन्वयक अॅड. फाऊख निझामी यांनी दिली. केंद्राने लागू केलेला कायदा महाराष्ट्रात …

Read More »

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्याची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या …

Read More »

पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर …

Read More »

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …

Read More »

पंतप्रधान म्हणतात चर्चा झाली नाही, मग स्थानबध्द केंद्राचे पत्र कसे जारी केले एनआरसी कायद्यावरून खोटं बोलत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी कायद्याबाबत मंत्रिमंडळात आणि संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र देशाचे गृहमंत्री सीएए आणि एनआरसी कायदा संपूर्ण भारतात राबविणार असल्याचे संसदेसह इतर ठिकाणी जाहीररित्या सांगत आहेत. तसेच स्थानबध्द केंद्र स्थापन करण्याबाबत सर्व सरकारांना केंद्राकडून पत्र पाठविण्यात आल्याने मग चर्चा न करताच ही …

Read More »

भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

मुंबईः प्रतिनिधी मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. …

Read More »

भारत देश म्हणजे धर्मशाळा आहे का? मनसेप्रमुख राड ठाकरे यांची नागरीकत्व कायद्यावर टीका

पुणेः प्रतिनिधी १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता अशी खोचक विचारणा करत सर्व देशाच्या लोकांना सामावून घ्यायला भारत देश काय धर्मशाळा आहे असा सवाल नागरीकत्व कायद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून …

Read More »

संकटातील अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी नागरीकत्व कायदा आणला भारतातील धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवारांची भीती

पुणेः प्रतिनिधी देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आणि संकटात असताना नागरीकत्व कायदा (CAA) कायदा आणून या मुळ मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच या कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार …

Read More »