Breaking News

Tag Archives: ncp

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा टोला, एकाबाजूला महापुरूषांबद्दल बोलू नका अन दुसऱ्याबाजूला…

मागील काही महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्याने आपल्या राजकिय भूमिकेत धरसोडपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन-तीन जाहिर सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भूमिका जाहिरपणे घेतली. भाजपाच्या अनुशंगाने भूमिका मांडली. मात्र काल मनसे गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी काही प्रमाणात …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण अद्यापही तापलेलं आहे. मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरील कारवाईची म्हणावी तशी मागणी होत नाही. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या …

Read More »

विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?

मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …

Read More »

महिलांनी बाबा रामदेवच्या फोटोला जोड्याने हाणले…

रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… रामदेवबाबा हाय हाय… समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो… मुखी राम राम बोला… याला जोड्याने हाणा… अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेवच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले. मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार

राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी …

Read More »

राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…

अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या तोंडावर …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार बोलल्यानंतर उध्दव ठाकरे…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं असताना त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. या दोघांच्या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेंस आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर तुटून पडलेले दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

शरद पवार म्हणाले, राज्यपालांनी आता मर्यादा ओलांडली…

राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शंका व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना …

Read More »

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?

राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »