बिगर भाजपा सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि राजकिय नेत्यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नोटीस आणि धाडी टाकण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. आता एका प्रकरणात ईडीने थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. …
Read More »काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, बदल गरजेचे; कामाची पध्दतही बदलली पाहिजे नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना केली सूचना
काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आणि प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा पक्ष प्रवेश होता होता राहिल्यानंतर काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना करत कान पिचक्या दिल्या. यावेळी सोनिया गांधींनी पक्षात बदल गरजेचे असून …
Read More »अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर सोनिया गांधी गेल्या भेटायला पण मोदींनी… सोनिया गांधीकडे बघणेही टाळले
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आज अनिश्चित कालासाठी संस्थगित झाले. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी तेथे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी सर्वांना नमस्कार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे पाहिलेही …
Read More »जी-२३ नेत्यांच्या बैठकीनंतर आझाद सोनिया गांधींच्या भेटीला, भेटीनंतर म्हणाले… विरोधकांना पराभूत करण्यावर एकमत
पाच राज्यातील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर गांधी कुटुंबियांवकडून राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली. परंतु काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना पदावर कायम ठेवले. नेमके त्याच दिवशी जी-२३ च्या नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर …
Read More »काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या आक्रमक म्हणाल्या, सोशल मिडीयाचा… दिर्घ काळानंतर लोकसभेत मांडली भूमिका
पाच राज्यातील झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्वाच्या मुद्यावर मोठा खल झालेला असला तरी पक्षाच्या धोरणात्मक बाजूवरही चर्चा झाली. त्याच चर्चेतील मुद्यांचा धागा पकडत दिर्घ काळानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की, राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला …
Read More »निवडणूक निकाला आधीच काँग्रेस घेतेय खबरदारी वरिष्ठ नेते पाठविले चार राज्यांमध्ये
गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. मात्र हा मतदानाचा टप्पा संपण्याआदीच काँग्रेसने मागील काही वर्षांमधील घडामोडींमधून धडा घेत सावध पावले आधीच उचलण्यास सुरुवात केली असून आधीप्रमाणे अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाला बसलेला फटका आणि हातची सत्ता जाण्यासारखे प्रकार यंदा काँग्रेसला टाळायचे …
Read More »