पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील चुरानचांदपूर आणि इम्फाळला दिली भेट मैतई बहुल इन्फाळमध्ये घेतली जाहिर सभा

इम्फाळ मध्ये राहणाऱ्या मैतई आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी-झो समुदायाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, मैतई आणि कुकी-झो नागरिकांनी डोंगराळ आणि खोऱ्यात सौहार्दपूर्ण पूल बांधण्याची गरज अधोरेखित केली. एकत्र पुढे जाण्यासाठी समावेशक विकास आणि परस्पर आदर आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसाचार दुर्दैवी आहे. ही हिंसाचार आपल्या पूर्वजांवर आणि आपल्या भावी पिढ्यांवर एक मोठा अन्याय आहे. म्हणूनच, आपल्याला मणिपूरला शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जावे लागेल आणि आपल्याला ते एकत्रितपणे करावे लागेल, असेही यावेळी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी उसळलेल्या जातीय हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो लोक विस्थापित झाले त्यानंतर पंतप्रधान मोदींचा मणिपूरचा हा पहिलाच दौरा होता. मे २०२३ मध्ये मणिपूर उच्च न्यायालयाने मैतईंना अनुसूचित जमातींच्या यादीत समाविष्ट करण्याचा विचार करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंग सरकारला दिले होते, ज्या आदेशाला कुकी-झो समुदायाने विरोध केल्यानंतर डोंगराळ भागामध्ये हिंसाचार उसळला होता.

कुकी-झो-बहुल चुराचंदपूर आणि त्यानंतर मैतई-बहुल इम्फाळ भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी हिंसाचारग्रस्त प्रदेशासाठी शांतता आणि विकास हा मध्यवर्ती संदेश म्हणून भर दिला.

इम्फाळमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे शतक ईशान्य आणि पूर्वेकडील आहे, त्यांनी या प्रदेशाच्या विकासावर त्यांच्या सरकारचे लक्ष अधोरेखित केले. आज, मणिपूरच्या प्रगतीसाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे प्रकल्प लोकांचे जीवनमान सुलभ करतील, पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि मणिपूरच्या तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील,” असेही सांगितले.

२०१४ पूर्वी एक टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढणाऱ्या मणिपूरने अलिकडच्या काळात जलद प्रगती केली आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी पश्चिम आणि दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये विकास झाला, स्वप्ने तिथे आकाराला आली आणि तरुणांना संधी मिळाल्या. परंतु २१ वे शतक पूर्व, ईशान्येकडील आहे. म्हणूनच भारत सरकारने मणिपूरच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. परिणामी, मणिपूरचा विकास दर सातत्याने वाढत असल्याचा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणने चर्चेचे सर्व मार्ग केले बंद अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडूनच प्रतिशोध घेतला जाईल असे इराणचे भाकित

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, तेहरानने युद्धविराम करार करण्यात अपयश आल्यास “संपूर्ण सभ्यता नष्ट होईल” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *