Breaking News

काँग्रेसने मविआची जागा राखली, तर जयश्री जाधव म्हणाल्या “स्वाभिमान राखला” सतेज बंटी पाटीलांचे रणनीती आली कामाला

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाने हिंदूत्व आणि भोंगा विरूध्द आरती असा नवा राजकिय सामना सुरु केल्यानंतर मनसेने त्यात उडी घेतल्याने उत्तर कोल्हापूरची पोट निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका याच मुद्यावर लढली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. मात्र या दोन्ही मुद्यांना उत्तर कोल्हापूरकरांनी फारशी भीक न घालता काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ८०० मतांनी विजय मिळविला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली.

दोन दिवसांपूर्वी मतदानाच्या दिवसापासून आधी एकतर्फी वाटणारी निवडणूक अटी-तटीचे झाल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडूण आला तरी त्याचे मार्जिन अर्थात आघाडी कितीची असेल याबाबत तर्क वितर्क लढविण्यात येत होते. मात्र अखेर जयश्री जाधव यांनी मिळविला असून या निवडणूकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांची रणनीती उपयोगास आल्याचे बोलले जात आहे.

निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या की, कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना ५५१५ तर सत्यजित कदम यांना २५१३ मते मिळाली. तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना ४९२८ तर सत्यजित कदम यांना २५६६ मते मिळाली. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या ७५०१ मतांनी आघाडीवर होत्या.

चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना ३७०९ तर सत्यजित कदम यांना ३९३७ मते मिळाली. तर पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी,भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत ४१९८ मते मिळवली आहेत. मात्र पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी ४६८९ तर सत्यजित कदम यांनी २९७२ मते मिळवली.

दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २८६८ तर सत्यजित कदम यांना ३७९४ मते मिळाली. अकाराव्या फेरीत जाधव यांना २८७० तर कदम यांना २७५६ मते मिळाली.

२०व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी १५ हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ या भागातील मतपेट्या उघडल्या नंतर जयश्री पाटील यांना ४३६६ तर सत्यजित कदम यांना ३०७४ मते मिळाली. दरम्यान चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *