मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राज्यात ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या २५ हजार ८६६ शाळा असून या शाळांमध्ये ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २ लाख ७५ हजार ४७० शिक्षक कार्यरत आहेत. ९६ हजार ६६६ शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. राज्यातील एकूण २५ हजार ८६६ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा सुरु झालेल्या आहेत. तर शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags cm uddhav thackeray maharashtra school started from 23 November schools started varsha gaikwad
Check Also
नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली
जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …