Breaking News

वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षण मिळवायचे असेल तर ओबीसींनी… मुस्लिम लिग आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी जाहीर

मराठी ई-बातम्या टीम
निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही, पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे काही करत आहे ते एकादृष्टीने घटनाविरोधी असल्याचे वक्तव्य करत ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही असे वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची राजद आणि इंडियन यूनियन मुस्लीम लीगसोबत आघाडी झाली असल्याचं त्यांनी जाहीर केले.
ओबीसीला आरक्षण हवे असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय गत्यंतर नाही. सर्वोच्च न्यायालयाला हवा असलेला इम्पीरिकल डेटा हा जनगणनेतूनच मिळू शकतो. कोर्टाने राखीव जागांना विरोध केलेला नाही. राखीव जागांना पाठबळ देणारा मागासलेपणाचे मोजमाप करणारा डेटा जनगणनेतून मिळेल. व हा डाटा सादर केल्यानंतर त्यानंतरच ओबीसींना आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून वंचित बहुजन आघाडीने ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या नेत्यांसमवेत चर्चा केली. त्याच प्रमाणे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर ही चर्चा झाली. या चर्चेमधे तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगतया आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या इतर काही संघटनांच्या बरोबर ही चर्चा सुरू आहे. इतर काही संघटना यामध्ये आगामी काळात सामील होतील. तशी बोलणी चालू आहे. साधारणत: जानेवारीच्या मध्यापर्यंत यातील जागावाटप निश्चित करून प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही मुंबई मनपाची निवडणूक राष्ट्रीय जनता दल व मुस्लिम लीग याना बरोबर घेऊन लढत आहोत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएम बरोबर युती करण्याचा विचार नाही. शिवसेना वा काँग्रेससाठीही आमचे दार उघडे आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.
ओबीसींनी औरंगाबाद लोकसभेत सेक्युलर भूमिकेतून मतदान केले असूनही औरंगाबादमध्ये एमआयएमने सेक्युलर भूमिकेतून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाता येत नाही. ओबीसींना विश्वास देण्याचे काम एमआयएमने केले तर आगामी काळातील निवडणुकांबाबत विचार होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले.
एमपीएससीची पेपरफुटी प्रकरणी त्यांना विचारले असता परीक्षा घेण्याचे कंत्राट खाजगी संस्थेला का देतात यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमपीएससी हे बोर्ड रद्द केलं पाहिजे असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या प्रश्नावर लढणार असल्याचे सांगत राज्यातील परिवहन सेवाही तोट्यात चालली असून सरकारकडे धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद नाही. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी दाखविला.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय कंडारे, मुंबई अध्यक्ष अकबर अली खान, मुंबई युवा अध्यक्ष मुर्तुझा शेख, मुंबई युवा महासचिव सोहेल अन्सारी तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगचे महाराष्ट्र महासचिव सी एच अब्दुल रहमान, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते अब्दुल रहमान, कॉल अब्दुल मुल्ला, खजिनदार डॉक्टर इब्राहीम कुट्टी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *