Breaking News

उध्दव ठाकरे यांचा आरोप, त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचेत… ते दुसऱ्यांचे आदर्श पळवत स्वत:चे म्हणून दाखवायचेत

शिवसेनेचे पक्षप्रमुख असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून अनपेक्षितरित्या उतरावे लागल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या बंडाळीबरोबरच भाजपावरही त्यांनी टीका केली.

शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो लावून, त्यांना सभांमध्ये घेऊन जाऊन, भाषण ठोकून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटातील शिवसेना नेत्यांना दिले. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.

बाळासाहेबांनंतर शिवसेना संपवायचा त्यांचा डाव होता. पण तुम्ही शिवसेना उभी केली, असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला स्वत:चे आदर्श निर्माण करता आले नाहीत, असा टोला लगावत त्यांचा दुसऱ्यांचे आदर्श पळविण्याचा उद्योग आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना उभी केली हेच त्यांच्या पोटात दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाष चंद्र बोस, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतायत तसे आदर्श पळवायचे. ते आदर्श आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला.

बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. कोणीही असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात बोलला तर लोक त्याला जोड्याने हाणतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका, असेही त्यांनी बंडखोरांना सुणावलं.

प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी. आज माझ्या दुर्देवाने माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत पण ते नेहमी माझ्यामध्ये आहेत. पण ज्यांचे ज्यांचे आई-वडील सुदैवाने त्यांच्यामध्ये आहेत त्यांना मी म्हणेन की असा आशीर्वाद पुन्हा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय? असा सवालही त्यांनी बंडखोरांना केला.

माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं, असे आव्हानही त्यांनी यावेळी बंडखोरांना दिले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *