नुकतेच ओबीसीच्या इम्पिरियल डेटा गोळा करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कान टोचल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहीत धरू नये अशी मागणी करत योग्य ती माहिती गोळा करण्याची सूचना करावी अशी विनंती केली.
वाचा
- केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी दिला ‘हा’ इशारा
- राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यानंतर ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी
राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
वाचा
- देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; स्वातंत्र्यसैनिकांची कंपनी गांधी घराण्याच्या घशात
- काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर …
यासंदर्भात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी सूचनाही त्यांनी केली.
ओबीसी समाजाला राजकीय मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी (डाटा) जमा होईल यात लक्ष घालावे असे आवाहनही त्यांनी केले.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हेच ते पत्रः
हे ही वाचा