काल मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती असा आरो केला. फडणवीस यांच्या या आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज फडणवीसांवर टीकेची झोड उठवित फडणवीसजी तुम्हीही मुख्यमंत्री होतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांला किती अधिकार असतात याची तुम्हाला माहिती असेल असा खोचक टोला लगावला.
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्रजी यांना एक सांगू इच्छिते की, आपण देखील मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला किती अधिकार असतात. हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या विधानाला काही अर्थ नाही. आदित्य ठाकरे यांना एका प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आजवरच्या अनेक घडामोडीमधून देवेंद्रजी सुडाचे राजकारण करित असल्याचा पलटवार केला.
यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, फोन टॉपिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला यांच्यावर का कारवाई करत नाहीत. यातून देवेंद्र फडणवीस हे कपटी राजकारणी आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा त्यांनी साधला.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आशिष शेलार यांनी आपल्या घराला कंपाउंड लावून घेतली पाहिजे. मी काय बोलत आहेत. त्यावेळी आशिष शेलार यांना नक्कीच कळले अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाच नेतृत्व अमित शाह हे मातोश्रीच्या पायर्या का झिजवत होते. शाह यांना विचारा अपयशी नेत्याकडे कशाला सारखे येत होता. तुमच्यासोबत आल्याने आमच्या दहा जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते अपयशी आहेत. अशा शब्दात आशिष शेलार यांच्यावरही टीका केली.