Breaking News

नारायण राणे म्हणाले, त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही काँग्रेस, शिवसेनेला दिला इशारा

फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील रिफायनरीला विरोध केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प नाणारऐवजी बारसू गावात करण्याची तयारी दर्शविली. त्यातच आता या प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणचा दौरा करत स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर या रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध राहणार असल्याचे जाहिर केले. यासंदर्भात केंद्रीय लघु मध्यम आणि सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, नाणार रिफायनरी प्रकल्प हा होणार असून त्यासाठी कोणाचाही विरोध चालू देणार नाही असे जाहीर केले.

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का? या माध्यमांच्या प्रश्नावर नारायण राणेंनी हे उत्तर दिले आहे. ठरलेल्या ठिकाणीच नाणार रिफायनरी होणार असून या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही,.या संदर्भात काही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही राणे यांनी दिली.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प गेली सात वर्षे चर्चेत आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात १३ हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षाच्या सुरवातीला पाठवला होता. या प्रस्तावाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

‘रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) हा ६० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्रकल्प रत्नागिरीतील नाणार येथे होणार होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या भारतीय कंपन्या आणि सौदी अरामको, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांनी त्यासाठी सामंजस्य करार केला होता. पण, नाणार येथील भूसंपादनातील पर्यावरण व पुनर्वसनाच्या समस्येमुळे हा प्रकल्प बारगळला. आता प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातीलच बारसू परिसराचा पर्याय पुढे आला आहे. हा प्रकल्प झाल्यावर महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नात ८.५ टक्के भर पडेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *